शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

By admin | Updated: December 24, 2016 01:39 IST

गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च

चार आठवड्यांत रक्कम देणार : विभागीय आयुक्तांचे शपथपत्र गजानन मोहोड ल्ल अमरावती गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर राज्य शासनाने २ मार्च २०१५ ला घेतला होता. मात्र, अद्याप निधी दिला नसल्याने न्यायालयाने पुन्हा शासनाला फटकारले असता चार आठवड्याच्या आत निधी देण्याचे शासनाने मान्य केले. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयांची मदत मिळण्याची आशा आहे. गतवर्षी शासनाने दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नव्हता. तसेच एनडीआरच्या निर्णयानंतर मदत दिली नाही. याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर शासनाने ५० पैशाच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली. अशी मिळणार सोयाबीनसाठी मदत ४पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात जिल्ह्यात १०९३६.५९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७९१७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव ६०१.४०, अंजनगाव ६०१.१०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. कपाशीसाठी ३९ कोटी मिळणार ४कपाशीपिकासाठी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत मिळणार आहे. यामध्ये दर्यापुरात एक हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपये अशी एकूण १८४८ शेतकऱ्यांना ३९ कोटी ४४ हजार १८१ रुपये मदत दिली जाईल.