शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

६४ वर्षांनी सात-बारावरील ‘ कुळ ’ निघणार ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 08:30 IST

Amravati News १९५८ च्या कुळ कायद्याने प्राप्त शेतजमिनीचा भोगवटदार वर्ग बदल करणे आता शक्य होत आहे.

ठळक मुद्देशेतसाऱ्याच्या ४० पट नजराणा भरल्यावर भोगवटदार वर्ग बदल

गजानन मोहोड

अमरावती :  १९५८ च्या कुळ कायद्याने प्राप्त शेतजमिनीचा भोगवटदार वर्ग बदल करणे आता शक्य होत आहे. यासाठी शेतसाऱ्याच्या ४० पट नजराणा रक्कम महसूल विभागाकडे भरावी लागेल व त्यानंतर सात-बारावरील सत्ता प्रकाराची नोंद कमी करण्यात येणार आहे. विदर्भात प्रथमच अमरावती जिल्ह्यात या अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम राबविला आहे.

मुंबई कुळवहिवाट शेतजमीन (विदर्भ) अधिनियम १९५८ अधिनियमांतर्गत दाखल शेतजमिनीची खरेदी-विक्रीच्या दिनांकापासून १० वर्षांचा काळ लोटला असेल, अशा जमिनी करिता जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम शासनाकडे भरल्यास व अन्य अटींची पूर्तता करीत असल्यास सातबारावरील भोगवटदार वर्ग २ या सत्ता प्रकाराची नोंद कमी करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्तांद्वारे या अभियानासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते व प्राप्त झाल्यावर १ मे ते २७ जुलै या दरम्यान कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सात-बारावरील भोगवटदार वर्ग बदल झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला पीक कर्ज मिळू शकेल. जमिनीचे हस्तांतरण सुलभ होणार आहे. आता भोगवटदार वर्ग-२ असल्यामुळे त्यांना प्रत्येक कामासाठी महसूल विभागाकडे धाव घ्यावी लागते, ती बंद होणार आहे.

असा आहे कुळ कायदा

पूर्वी जमीनदार, सावकार आदींकडे असलेल्या शेतजमिनी वहिवाटीसाठी अन्य शेतकऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ‘ जो कसेल त्याची जमीन ’ याअंतर्गत १ एप्रिल १९५७ रोजीच्या कायद्यान्वये जमीन कसणाऱ्या व्यक्तीला जमिनीचा मालक करण्यात आले. मात्र, यामध्ये सात-बारावरील भोगवटदार वर्ग-२ ठेवण्यात आलेला आहे.

नजराणा रक्कम म्हणजे काय ?

राज्यामध्ये सन १९५८ च्या कुळ कायद्याने जमीन संबंधित शेतकऱ्याला प्राप्त होत असली तरी या जमिनीचा मूळ मालक शासन आहे. त्यामुळे मूळ जमीन मालकाला ही काही देणे लागते. या प्रक्रियेमध्ये शेतसाऱ्याच्या ४० पट रक्कम संबंधिताला भरावी लागते, यालाच नजराणा रक्कम म्हणतात.

टॅग्स :Governmentसरकार