शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतील क्रीडापाठोपाठ रेखाकला गुणांवरही गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अध्यापन जेमतेम झाले. त्यातच गतवर्षी क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा क्रीडा गुण ...

अमरावती : कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अध्यापन जेमतेम झाले. त्यातच गतवर्षी क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा क्रीडा गुण मिळणार नसल्याचे चित्र आहे. आता रेखाकला परीक्षेचे गुण देण्यात येऊ नये, असे पत्र तंत्रशिक्षण विभागाने काढले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, ज्यांनी चित्रकलेच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत, त्यांना तरी गुण मिळावे, अशी मागणी कला शिक्षकांमधून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार दहावी बोर्ड परीक्षेत गुण दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या वर्गातील चित्रकलेची अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार नाहीत. दरम्यान, अनेक विद्यार्थी सातवी आणि आठवीच्या वर्गातच या परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना तरी चित्रकला गुण द्यावे, अशी मागणी कला शिक्षकांमधून होत आहे.

---------------

बॉक्स

ग्रेडनुसार मिळणार गुण

ए- ७ गुण

बी - ५ गुण

सी -३ गुण

बॉक्स

गतवर्षी बोर्डाकडे सादर प्रस्ताव ३३०१

अपात्र झालेले प्रस्ताव २५३

रेखाकला गुण मिळालेले विद्यार्थी ३०४८

कोट

गत दोन वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर केले आहेत. त्यांच्यावर अन्याय न करता रेखाकलेचे गुण देण्यात यावेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

- विनोद इंगोले, कला शिक्षक

----------------

कोट

दरवर्षी चित्रकलेची परीक्षा घेतली जाते. हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. दोन सत्रांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिसाद चांगला असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे परीक्षा झालेल्या नसल्याने गुण न देण्याचा निर्णय झाला. तो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे.

- संजय श्रीखंडे, कलाशिक्षक

--------------

कोट

चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांनी गुणांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. अनेक जण दहावीच्या वर्गात असताना चित्रकलेची अंतिम परीक्षा देणार होते. मात्र, कोरोनामुळे चित्रकला परीक्षा होऊ शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

- कोमल देशमुख, विद्यार्थी

------------

कोट

आम्ही रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. बोर्डात शाळेच्यावतीने प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे गुण देण्यात यावेत. गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दाेन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त प्रस्तावानुसार गुणदान व्हावे.

- पियू मराठे, विद्यार्थी