शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

बाधित खरिपाकडे ‘नजरअंदाज’, जिल्हाधिकाऱ्यांकडून ६० पैसेवारी जाहीर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 29, 2023 22:24 IST

दोन हजार गावांतील वास्तव चित्र नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

अमरावती : ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड असल्याने उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येणार म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. अन् आठ दिवसांत जिल्हाभरातील सर्वच म्हणजे १९९० गावांतील नजर अंदाज ६०.२९ पैसेवारी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बाधित खरीप पिकांकडे ‘नजरअंदाज’ करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा पेरणीपासून संकटाचे शुक्लकाष्ट शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे. मान्सूनला तीन आठवडे विलंब लागल्याने खरीप पेरण्या उशिराने झाल्या. त्यातच जुलैमध्ये संततधार पाऊस व ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ८० हजार हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा खुद्द महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली व कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पिकांचे वास्तववादी चित्रण नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तालुकानिहाय गावे, जाहीर नजरअंदाज पैसेवारीअमरावती तालुका १४३ गावे (नजरअंदाज पैसेवारी ५७), भातकुली १४२ (६४), तिवसा ९९ (५५), चांदूर रेल्वे ९१ (५७), धामणगाव ११५ (६३), नांदगाव खंडेश्वर १६१ (६८), मोर्शी १५९ (६२), वरुड १४२ (६४), अचलपूर १८६ (५७), चांदूरबाजार १७१ (५५), दर्यापूर १५६ (६०), अंजनगाव सुर्जी १२८ (६०), धारणी १५२ (५९) व चिखलदरा तालुक्यात १४५ गावांत ५५ नजरअंदाज पैसेवारी आहे.