शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बाधित खरिपाकडे ‘नजरअंदाज’, जिल्हाधिकाऱ्यांकडून ६० पैसेवारी जाहीर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 29, 2023 22:24 IST

दोन हजार गावांतील वास्तव चित्र नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

अमरावती : ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड असल्याने उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येणार म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. अन् आठ दिवसांत जिल्हाभरातील सर्वच म्हणजे १९९० गावांतील नजर अंदाज ६०.२९ पैसेवारी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बाधित खरीप पिकांकडे ‘नजरअंदाज’ करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा पेरणीपासून संकटाचे शुक्लकाष्ट शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे. मान्सूनला तीन आठवडे विलंब लागल्याने खरीप पेरण्या उशिराने झाल्या. त्यातच जुलैमध्ये संततधार पाऊस व ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ८० हजार हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा खुद्द महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली व कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पिकांचे वास्तववादी चित्रण नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तालुकानिहाय गावे, जाहीर नजरअंदाज पैसेवारीअमरावती तालुका १४३ गावे (नजरअंदाज पैसेवारी ५७), भातकुली १४२ (६४), तिवसा ९९ (५५), चांदूर रेल्वे ९१ (५७), धामणगाव ११५ (६३), नांदगाव खंडेश्वर १६१ (६८), मोर्शी १५९ (६२), वरुड १४२ (६४), अचलपूर १८६ (५७), चांदूरबाजार १७१ (५५), दर्यापूर १५६ (६०), अंजनगाव सुर्जी १२८ (६०), धारणी १५२ (५९) व चिखलदरा तालुक्यात १४५ गावांत ५५ नजरअंदाज पैसेवारी आहे.