शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

बाधित खरिपाकडे ‘नजरअंदाज’, जिल्हाधिकाऱ्यांकडून ६० पैसेवारी जाहीर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 29, 2023 22:24 IST

दोन हजार गावांतील वास्तव चित्र नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

अमरावती : ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड असल्याने उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येणार म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. अन् आठ दिवसांत जिल्हाभरातील सर्वच म्हणजे १९९० गावांतील नजर अंदाज ६०.२९ पैसेवारी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बाधित खरीप पिकांकडे ‘नजरअंदाज’ करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा पेरणीपासून संकटाचे शुक्लकाष्ट शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे. मान्सूनला तीन आठवडे विलंब लागल्याने खरीप पेरण्या उशिराने झाल्या. त्यातच जुलैमध्ये संततधार पाऊस व ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ८० हजार हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा खुद्द महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली व कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पिकांचे वास्तववादी चित्रण नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तालुकानिहाय गावे, जाहीर नजरअंदाज पैसेवारीअमरावती तालुका १४३ गावे (नजरअंदाज पैसेवारी ५७), भातकुली १४२ (६४), तिवसा ९९ (५५), चांदूर रेल्वे ९१ (५७), धामणगाव ११५ (६३), नांदगाव खंडेश्वर १६१ (६८), मोर्शी १५९ (६२), वरुड १४२ (६४), अचलपूर १८६ (५७), चांदूरबाजार १७१ (५५), दर्यापूर १५६ (६०), अंजनगाव सुर्जी १२८ (६०), धारणी १५२ (५९) व चिखलदरा तालुक्यात १४५ गावांत ५५ नजरअंदाज पैसेवारी आहे.