शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा

By admin | Updated: April 21, 2016 00:09 IST

खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे.

शेतकऱ्यांजवळ माल नाही : कापूस, सोयाबीन व तुरीच्या भावात तेजी अमरावती : खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी सरताच शेतमाल मिळेल त्या भावात विकला. शेतकऱ्यांच्या मालास कवडीमोल भाव मिळाला. आता शेतकऱ्यांजवळ साठवण केलेला माल नाही. मात्र बाजारात सोयाबीन, कापूस, तुरीचे भाववाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत असल्याने हंगामातच शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यावर भाव वाढतात हे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे ‘वेअर हाऊस’ची संकल्पना अलिकडेच आली आहे. शेतमालास जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी गोदामात शेतमाल ठेऊन त्यावर कर्जस्वरुपात रक्कम घेऊन आपल अडचण भागवितात. शेतमाल ठेवण्यासाठी थोड्याप्रमाणात भाड्याची आकारणी केली जाते. या वेअर हाऊसची निर्मितीही शेतकऱ्यांसाठीच असली तरी याचा खरा फायदा व्यापारी घेत असल्याचे दिसून येते व भाववाढ झाल्यावर व्यापारी गोदामातून माल विक्रीसाठी काढून त्याचा फायदा घेतात. घाम न गाळता मिळत असल्याने नफ्याने व्यापारी मालामाल होत आहे. शेतकऱ्यांचा माल मात्र कवडीमोल भावाने विकल्या गेला आहे.