शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ‘निगेटिव्ह’ अहवालानंतर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या ...

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मध्यप्रदेश राज्याने याआधीच चाचणी करणे बंधनकारक केले आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारपासून दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी गरजेचे आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, रुग्णवाहिकांसाठी यातून सूट असेल. शहरात विनामास्क अनावश्यक फिरणाऱ्यांची फिरत्या पथकातर्फे दंडासोबतच ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू वगळता सुरू असलेल्या इतर दुकाने आणि आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची उपलब्धता प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णालयांना अत्यावश्यक असल्यासच कमी प्रमाणात रेमडेसिविरचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माफक दरात ही औषधे मिळण्यासाठी पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांमध्ये सुधारणा दिल्यास रेमडेसिविरचा उपयोग थांबविण्यात यावा. तसेच ऑक्सिजन पातळी वाढल्यास रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवावा, अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्याचे जिल्हधिकारी म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाचे डबल म्युटेशन झालेले नाही. जिल्ह्यातून पाठविलेल्या चाचण्यांचा याप्रकारे कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.

----------------

४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करावे

जिल्ह्यातील लसीकरण नियमित सुरू आहेत. लसीच्या पुरवठ्यावर लसीकरण केंद्र सुरू राहतील. लसीमुळे कोरोनाची लागण झाली तरी संसर्ग कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीकरणानंतरही हात धुणे, मास्कचा उपयोग, परस्परांमध्ये अंतर राखण्याचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले.