शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ‘निगेटिव्ह’ अहवालानंतर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या ...

अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मध्यप्रदेश राज्याने याआधीच चाचणी करणे बंधनकारक केले आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारपासून दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी गरजेचे आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, रुग्णवाहिकांसाठी यातून सूट असेल. शहरात विनामास्क अनावश्यक फिरणाऱ्यांची फिरत्या पथकातर्फे दंडासोबतच ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू वगळता सुरू असलेल्या इतर दुकाने आणि आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची उपलब्धता प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णालयांना अत्यावश्यक असल्यासच कमी प्रमाणात रेमडेसिविरचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माफक दरात ही औषधे मिळण्यासाठी पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांमध्ये सुधारणा दिल्यास रेमडेसिविरचा उपयोग थांबविण्यात यावा. तसेच ऑक्सिजन पातळी वाढल्यास रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवावा, अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्याचे जिल्हधिकारी म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाचे डबल म्युटेशन झालेले नाही. जिल्ह्यातून पाठविलेल्या चाचण्यांचा याप्रकारे कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.

----------------

४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करावे

जिल्ह्यातील लसीकरण नियमित सुरू आहेत. लसीच्या पुरवठ्यावर लसीकरण केंद्र सुरू राहतील. लसीमुळे कोरोनाची लागण झाली तरी संसर्ग कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीकरणानंतरही हात धुणे, मास्कचा उपयोग, परस्परांमध्ये अंतर राखण्याचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले.