शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रशासकीय राजवटीने नगरपंचायतींची सुरुवात?

By admin | Updated: March 26, 2015 00:02 IST

मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापनेचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गजानन मोहोड अमरावतीमुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापनेचा निर्णय शासनाने घेतला आहे. राजपत्रात अधिसूचना प्रसिध्द होऊन या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र हे नागरी क्षेत्रात संक्रमित झाले आहे. अशा तिवसा, भातकुली व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत आयोगाने ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया घोषित केली आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी की, प्रशासकाची नियुक्ती करावी याविषयी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी नगर विकास विभागाकडे बुधवारी मत मागितले आहे.शासनाने तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय घेतला आहे. त्याअन्वये जिल्ह्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या तालुका मुख्यालयी नगरपंचायती स्थापनेसंदर्भात ३१ मे २०१४ राजपत्रात अधिसूचना जारी झाली. ३० पर्यंत कुठलेच आक्षेप नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने या नगरपंचायतीचे अहवाल नगर विकास विभागाकडे पाठविले. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नागरी अधिनियम यांचे कलम ३४१ (क) व पोटकलम (१) (१क) व (२) या अन्वये तसेच शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग यांचे १ मार्च २०१४ याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात उदघोषणा प्रसिध्द झाल्याने या सर्व तालुका मुख्यालयी असनाऱ्या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र हे नागरी क्षेत्रात संक्रऊम्ऋत झाले आहे. याविषयी ग्रामपंचायतीचे सकारात्मक अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय हा नगरविकास विभागाकडे याच आठवड्यात पाठविण्यात आला आहे.नगरपंचायतीची ही प्रक्रिया सुरु असतानाच निवडणूक आयोगाने भातकुली १५ मे २०१५, नांदगाव ८ मे व तिवसा १५ मे तारखेला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपंचायती ठिकाणी तहसीलदार यांची प्रशासक म्हणून निवड करावी, या विषयीच्या सूचना व मार्गदर्शक माहिती यापूर्वी जिल्हा प्रशासनाला मिळाली असल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी नगरविकास विभागाकडे या नगरपंचायत ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया राबवावी की, प्रशासकाची नियुक्ती करावी याविषयी मत मागविली आहे. यानंतर याच महिन्यात मुदत संपणाऱ्या अन्य तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी तहसीलदार यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यामुळे याच निर्णयाची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन नगरपंचायतींची सुरुवात मार्च अखेरपर्यंत प्रशासकीय राजवटीने सुरु होण्याची शक्यता आहे. अन् तालुका मुख्यालयी प्रशासकवर्धा जिल्ह्यातील सेलू ग्रामपंचायतीची मुदत १४ मार्च २०१५ रोजी संपुष्टात आली असता तेथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शासनाने रद्द केली व त्याच दिवशी तहसीलदार यांची सेलू नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली.प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दालनातजिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या क्षेत्रात ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने नगरविकास विभागाकडे संपर्क केला असता या नगरपंचायतीचा प्रस्ताव हा सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविल्याचे सांगितले. यावर दोन दोन, चार दिवसांत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.या नगरपंचायतींचे प्रस्ताव नगरविकासकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात हे प्रस्ताव आहे यावर दोन चार दिवसात निर्णय होणार आहे.- स.ना. पाटील,कक्ष अधिकारी नगर विकास विभाग, मुंबई.