शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

नऊ पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

By admin | Updated: July 5, 2014 00:24 IST

राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द ...

अमरावती : राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आली. याविषयीची अधिसूचना ३ जुलै रोजी काढण्यात आली होती. अधिसुचनेनुसार ५ जुलै रोजी जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांचा मुदतवाढ कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे व त्याच दिवसी या नगरपंचायतींवर पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय राजवट राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव (सुर्जी), दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी, वरूड व शेंदूरजनाघाट या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाल हा २८ जून २०१४ रोजी संपुष्ठात येणार होता. तत्पूर्वी शासनाने १० जूनला अधिसूचना काढून या पदांच्या निवडणुकांना मनुष्यबळ उपलब्ध नाही हे कारण दर्शवीत सहा महिने किंवा शासन ठरवेल त्या उक्त दिनांकाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत ही मुदतवाढ होती. दरम्यान २ जुलै रोजी शासनाने आपलाच निर्णय महिनाभऱ्याच्या आत फिरवून ही मुदतवाढ रद्द केली. परिणामी विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाल हा ५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या नऊही नगराध्यक्षांना शनिवार ५ जुलै रोजी कार्यमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उपाध्यक्षपदाचादेखील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु या निवडणुकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा स्थगनादेश आहे. त्यामुळे प्रभार देण्याच्या भानगडीत न पडता जिल्हा प्रशासनाने या नऊही नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)