शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

हिवरखेड येथील अवैध बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ

By admin | Updated: March 14, 2015 00:39 IST

शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी..

मोर्शी : शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी न्याय मागायचा कोणाकडे, हा प्रश्न हिवरखेड येथील महिलेसमोर उपस्थित झाला आहे.हिवरखेड येथील पंचफुलाबाई महादेवराव तंतरपाळे यांना घर बांधण्याकरिता महसूल विभागातर्फे रकमेचा भरणा करुन २००२ मध्ये खुला प्लॉट देण्यात आला होता. त्याच वेळेस अंबादास पंडागळे या लाभार्थ्यालासुध्दा पंचफुलाबाई यांच्या शेजारी असलेला प्लॉट देण्यात आलेला होता. मात्र पंडागळे यांनी शासकीय रकमेचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नायब तहसीलदार यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून त्यांचा या भूखंडावर कोणताही हक्क राहिला नसल्याचे कळविले आहे. पंडागळे यांनी मागील दोन महिन्यांपासून शासनाच्या या जागेवर अतिक्रमण करुन शिवाय शेजारच्या पंचफुलाबाई तंतरपाळे यांच्या ताब्यातील रिकाम्या जागेवरसुध्दा पक्के बांधकाम सुरु केले. पंचफुलाबाई यांनी पंडागळे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ग्राम पंचायतीपासून तर आमदारांपर्यंत तक्रारी नोंदविल्या; मात्र पंडागळे यांचे बांधकाम मात्र कोणताही अधिकारी थांबवू शकला नाही. त्यामुळे कोणताही अधिकारी आपले बांधकाम थांबवूच शकत नसल्याची गर्वोक्ती सुध्दा पंडागळे करीत असल्याचा पंचफुलाबाई यांचा आरोप आहे. महसूल विभागाच्या प्लॉट वर अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी खऱ्या अर्थाने महसूल विभागाची आहे. तसेच तक्रारीनंतरही या बाबीकडे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय आणि चक्क दुसऱ्याच्या प्लॉटवर अतिक्रमण केले जात असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा मूग गिळून बसले असल्यामुळे, शेवटी याप्रकरणी न्याय मागायचा कोणाला, हा प्रश्न पंचफुलाबाई तंतरपाळे यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)