शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१४ जणांच्या निलंबनावर प्रशासनाचे शिक्कामोर्तब !

By admin | Updated: January 18, 2017 00:05 IST

कर्तव्यात कसूर, दप्तरदिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन.आभाळे यांनी....

जिल्हा परिषद : प्रभारी सीईओ जे.एन.आभाळेंचा धाडसी निर्णयजितेंद्र दखने अमरावतीकर्तव्यात कसूर, दप्तरदिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन.आभाळे यांनी शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकाच वेळी तब्बल १४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाण्याची जिल्हा परिषदेतील ही पहिलीच कारवाई होय. आभाळे यांच्या या धाडसी आणि धडाकेबाज निर्णयामुळे जिल्हा परिषदेत फोफावलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लागण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांनी शुक्रवारी झेडपीच्या बांधकाम विभागाची आकस्मिक तपासणी केली होती. बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात दप्तरदिरंगाई आढळून आली. कुलकर्णी यांनी दोषींवर नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर कुलकर्णी प्रशिक्षणासाठी दीड महिना जिल्ह्याबाहेर असल्याने निलंबन आदेशाच्या अंमलबजावणीचा सस्पेन्स कायम होता. कारवाईची कुणकुण लागताच कर्मचाऱ्यांनी प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन. आभाळे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याची रणनीती वापरली होती. तथापि कुठल्याही दबावाला बळी न पडता आभाळे यांनी कर्तव्यदक्ष निर्णय घेऊन प्रशासन कौशल्याची चुणूक दाखविली. (प्रतिनिधी)आज आदेश होणार जारीअत्यंत गोपनीय असलेल्या या निलंबन कारवाईवर प्रशासकीय स्तरावर शिक्कामोर्तब झाल्याची आणि संबंधित तमाम दोषींना बुधवारी निलंबन आदेश प्राप्त होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. खातेप्रमुखांचे टोचले कानकर्तव्यात कसूर करणाऱ्यांमध्ये ३ खात्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सीईओ किरण कुलकर्णी यांनी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिकाराचे विकेंद्रीकरण करून खातेप्रमुखांना निलंबनाचे अधिकार बहाल केले होते. याप्रकरणी आता त्याच अधिकारांचा वापर खातेप्रमुखांना करावा लागणार आहे. दबावात येणाऱ्या खातेप्रमुखांचे कान जे.एन. आभाळे यांनी टोचल्यानंतर संबंधित खात्यांचे प्रमुख बुधवारी निलंबन आदेश जारी करतील. कारवाई कुणावर ? निलंबन कारवाईत समावेश असलेल्या सर्व १४ कर्मचाऱ्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नसली तरी त्यात वित्त विभागाचे चार, बांधकाम विभागाचे दोन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एकूण १४ दोषींमध्ये दोन आरेखक आहेत. जालिंधर (जे.एन.) यांच्या ‘आभाळ’निर्णयाने कामचोरांमध्ये घबराट पसरणार, हे नक्की.