शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी प्रशासनाच्या मॅराथॉन बैठकी

By admin | Updated: November 22, 2014 22:52 IST

जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून खरीप व रबीचे हंगाम धोक्यात आले आहे. यंदा जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत केवळ ४६ पैसे आहे. या दुष्काळजन्य स्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

अमरावती : जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून खरीप व रबीचे हंगाम धोक्यात आले आहे. यंदा जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत केवळ ४६ पैसे आहे. या दुष्काळजन्य स्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांचा दौर असल्याने जिल्हा प्रशासनात आढावा घेण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरू आहे. प्रत्यक्षात कुठलीच कामे सुरू नसल्याने आता कृतीची गरज आहे.जिल्ह्याची पैसेवारी ४६ टक्के आहे. सर्वच तालुक्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. म्हणजेच जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. सोयाबीन वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. जमिनीत आर्द्रता नाही. यामुळे उत्पन्न घटले, खरिपासाठी जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. यापैकी काही क्षेत्र निकृष्ट बियाण्यांमुळे नापेर राहिले. नजर अंदाज आकडेवारी ६० टक्के दाखविण्यात आली. प्रत्यक्षात पीक कापणीचे प्रयोग झाल्यानंतर जिल्ह्याची आणेवारी ४६ टक्क्याच्या आत असल्याची बाब स्पष्ट झाली. परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंंडे ह्या सोमवार २४ नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहे. आणि २९ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पाहणी, सर्व्हे अहवाल यात जिल्हा व तालुका प्रशासन व्यस्त आहे. यासाठी विभाग जिल्हा व तालुकास्तर आढावा घेण्यासाठी बैठकीवर बैठकी सूरू आहे. २१ रोजी चवथा शनिवार व नंतर रविवार सुटीचे दिवस असताना बहुतेक जिल्हा कार्यालये सुरूच होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात ४७, भातकुली ४६, नांदगाव खंडेश्वर ४४, चांदूररेल्वे ४७, धामणगाव ४९, तिवसा ४३, मोर्शी ४६, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४६, दर्यापूर ४८, अंजनगाव ४०, धारणी ४८ व चिखलदरा ४९ पैसेवारी आहे.अशा दुष्काळजन्य स्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाई, वैरणटंचाई याची भिषण स्थिती राहणार आहे. त्यावेळी काय करायचे याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून अधिकारी करीत आहे. मात्र सध्या काही ही उपाययोजना होत नसल्याने नागरिक मात्र त्रस्त आहे. ग्रामीण भागात १२ तासांपेक्षा अधिक भारनियमन नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यात २०० रोहित्र जळाली आहे. रोहित्राची लागणी केल्यावर महावितरण टाळाटाळ करते, यामुळे रबी सिंचनाच्या समस्या निर्माण होत आहे. या मॅराथान बैठकीच्या माध्यमातून काहीतरी तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.