शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आदिवासी जननायक अजूनही उपेक्षेचा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:39 IST

आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला.

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला. ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणाºया क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. या क्रांतिकारी जननायकाला कधी न्याय मिळणार, असा सवाल राज्यातील आदिवासींनी सरकारला विचारला आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बुधवारी त्यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींचा वनसंपत्तीवरील अधिकार बाधित झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. सन १८९४ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ, उपासमारीने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी नि:स्वार्थी अंत:करणाने समाजाची सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करण्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.आदिवासी आमदार कधी घेणार दखल?झारखंड, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशात आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत मानतो. झारखंडात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिवीराच्या नावाने राबविण्यात आली नाही. राज्यात सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आहेत. त्यांनी दखल घेतल्यास बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एखादी योजना सुरू होऊ शकेल.संसदेबाहेर दिल्लीत बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे. इतर राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात एकही योजना नाही. त्यांच्या जयंतीला शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास बिरसा मुंडा यांना खºया अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.- जनार्र्दन नेवारे, सौंदळ