शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या आदित्यने चार तास पोलिसांना धरले वेठीस

By admin | Updated: July 14, 2014 00:47 IST

माझ्या आई-वडिलांनी मला मुंबईवरून चिखलदरा फिरायला

१३ वर्षीय मुलाचा प्रताप : आई-वडील सोडून गेल्याची बतावणीनरेंद्र जावरे चिखलदरामाझ्या आई-वडिलांनी मला मुंबईवरून चिखलदरा फिरायला आणले. एका पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडीत आम्ही आलो होतो. परंतु शनिवारी ते मला सोडून निघून गेले. एका १३ वर्षीय मुलाच्या या माहितीने चिखलदरा पोलिसांना धक्का दिला. दुपारी १२ वाजतापासून त्याच्या आई-वडिलाची सुरू झालेली शोधमोहीम चार तासांच्या खुलाशानंतर मुलाचा खोटारडेपणा उघडकीस आला. आदित्य राजेंद्र टेकाडे (१३, रा. वाशी मुंबई) असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान तो चिखलदरा येथील आयटीआय चौकावर परतवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांना हात दाखवीत होता. काही वेळाने चिखलदरा पोलीस ठाण्याचे जमादार रामचंद्र बुरनासे व अरुण कळसकर हे दुचाकीने जात असताना त्यांना सदर मुलगा दिसला. संशयाची पाल मनात आल्याने त्यांनी मुलास विचारणा केली. आदित्यने उपरोक्त घटनाक्रम कथन करताच दोघांनाही धक्का बसला. त्याला प्रेमाने पोलीस ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली. आम्ही शनिवारी चिखलदरा फिरायला आलो. त्यांनी मला सनसेट पॉर्इंटवर सायंकाळी ६ वाजता आणले व मला सोडून निघून गेल्याचे सांगितले. पॉर्इंट काढले पिंजूनचिखलदरा हे विदर्भाचे पर्यटन स्थळ. पूर्वी येथील खोल दरीत मोठ्या प्रमाणात आत्महत्या, हत्यासारख्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आदित्यला सर्व पॉर्इंट फिरविले. वारंवार प्रेमाने माहिती विचारली, जेवायला दिले. त्याने अमरावती येथील गाडगेनगरात बहीण राहत असल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांच्या दूरध्वनीवर संपर्क केला; परंतु झाला नाही. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा ठाणेदार बी. आर. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली. चार तासांपर्यंत पत्रकारांपासून सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधून माहिती देण्याचे कार्य नगरसेवक अरूण तायडे यांनी केले.अन् खुलासा झालापोलीस सतत चार तास आदित्यची विचारपूस करीत होती. परंतु आई-वडिलांनी सोडून दिल्याचे तो सांगत होता. अशात हरिकेन पॉर्इंटवर त्याच्या शोधात निघालेले शिक्षक व पोलिसांची गाठ पडली व खुलासा झाला. आदित्य मुंबई (वाशी) येथील आहे. त्याला पालकांनी शिक्षणासाठी चिखलदरा येथील दीपशिखा शाळेत शनिवारी आणून दिले होते. परंतु आपणास येथे राहायचे नसल्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे त्याने सांगितले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सतत चार तास त्याने पोलिसांना वेठीस धरले. आदित्यला सायंकाळी पाच वाजता शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. अमरावती येथील बहिणीकडे त्याला आता पोहचवून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.