शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

अतिरिक्त आयुक्तांवर मेहेरबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:04 IST

वर्षभरापूर्वी अधिकारशून्य करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे नव्याने नऊ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेले ५ लाखांपर्यंतचे वित्तीय अधिकार कमी करून त्यांना ३ लाख रूपयांच्या स्वाक्षरीचे धनी करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन लाखांचे अधिकार : नऊ विभागांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापूर्वी अधिकारशून्य करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे नव्याने नऊ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेले ५ लाखांपर्यंतचे वित्तीय अधिकार कमी करून त्यांना ३ लाख रूपयांच्या स्वाक्षरीचे धनी करण्यात आले आहे. तब्बल वर्षभरानंतर प्रशासनप्रमुखांनी अतिरिक्त आयुक्तांवर दाखविलेली मेहेरबानी सर्वार्थाने चर्चेची बाब ठरली आहे. २१ एप्रिल २०१८ रोजी पारित आदेशातील नमूद बाबींची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासही अतिरिक्त आयुक्तांना बजावण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे १३ विभागांसह ५ लाख रूपयांपर्यंतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र, स्वच्छता, पाणीपुरवठा, पशूशल्य व शिक्षण विभागाबाबत तक्रारी आल्याने शेटे यांच्याकडून या चार विभागासह वित्तीय अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे शेटे हे वर्षभरापासून फुलपगारी बिन अधिकारी बनले होते. शेटे यांच्याकडे महत्त्वपूर्ण विभाग नसल्याने मागील सहा महिन्यांत तर त्यांची छबी केवळ चौकशी अधिकारी म्हणून मर्यादित झाली होती. त्यांच्याविरूद्ध दोन विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्या. मात्र, २३ मे रोजी अचानक शेटे यांना काही विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये २ वर्षे पूर्ण करणाऱ्या शेटेंना बदलीचे वेध लागले आहेत. त्यामुळे उशिरा मिळालेल्या जबाबदारीचे वहन ते खरेच मनापासून करतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.स्वच्छता का नाही?स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शेटे यांनी भरीव कार्य केले. वैयक्तिक शौचालयाची योजना त्यांच्या अ‍ॅक्टिव्हनेसमुळे यशस्वी झाली. त्यामुळे विभाग नसतानाही व्यापक कार्य करणाºया शेटेंकडे स्वच्छता विभागाची जबाबदारी का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या विभागाची नव्याने जबाबदारीसांख्यिकी जनगणना, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण व क्रीडा विभाग, पशूसंवर्धन व कोंडवाडा विभाग, पाणीपुरवठा, पर्यावरण, समाजविकास व दलितवस्ती सुधारणा एप्रिल १७ मध्ये परत घेतलेल्या चार विभागांपैकी स्वच्छता वगळता अन्य तीन विभाग शेटेंना नव्याने बहाल करण्यात आले आहेत.