शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आॅनलाईन प्रवेशात अडसर

By admin | Updated: June 19, 2017 00:17 IST

कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या ...

भारनियमनाचा त्रास : महावितरणचा मनमानी कारभार लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे. सद्यस्थितीत शहरातील शेकडो विद्यार्थी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करीत असून, बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे तंत्र व उच्चशिक्षणाची प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यंदापासून अकरावीची प्रवेशप्रक्रियाही आॅनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यात अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना विजेचा लपंडाव सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी इन्व्हर्टर तथा जनरेटरचा वापर होत असला तरी अशी व्यवस्था नसलेल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांचे हात होत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका भारनियमनाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आॅनलाईन अर्ज सादर करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना सततच्या भारनियमनामुळे प्रवेशाचे अर्ज सादर करणे कठीण झाले आहे. काही दिवसांपासून शहरी भागातील महावितरणने अघोषित भारनियमन लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांसह सायबर कॅफेचे संचालक हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या भरवशावर आॅनलाईन सेंटर चालविणाऱ्या संचालकांना हल्ली अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. इयत्ता अकरावी, बारावी, अभियांत्रिकी, फॉर्मसी, पदवी परीक्षांचे प्रवेशपत्र आॅनलाईन सादर करावे लागत आहे. मात्र विजेअभावी आॅनलाईन प्रक्रिया ठप्प राहत असल्याने सायबर कॅफे सेंटरवर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ही नित्याचीच बाब झाली आहे. निश्चित कालावधीत आॅनलाईन प्रवेशपत्र सादर करावयाचे असल्याने विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.