शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:40 IST

कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यसभा खासदार संजय राऊत यांचे कंगनाबद्दलचे वक्तव्य म्हणजे समस्त महिलांचा अपमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आज मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने अभिनेत्री कंगना राणावत यांचे कार्यालय अनधिकृत म्हणून पाडले. अनेक वर्षांनंतर मनपाने ही कारवाई केली. कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. कंगनाने वक्तव्य केले त्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, संजय राऊत यांनी एका महिलेबद्दल अभद्र शब्दप्रयोग केला आहे, हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान आहे व याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर बसून कारभार चालवू नये.पूर्व विदर्भात भयानक पूरपरिस्थिती आहे. भंडारा-गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले आहे. बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी भटकत आहेत. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हॉस्पिटल मध्ये जागा नाही,आॅक्सिजन सिलेंडर नाहीत, मृत्यू वाढत आहेत या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानी आराम करीत आहेत व त्यांचे खासदार संजय राऊत हे खुलेआम महिलांचा अपमान करीत आहेत. मुख्यमंत्री निमूटपणे हा प्रकार बघून त्यांना पाठीशी घालत आहेत. हे सर्व अतिशय निंदाजनक असून जनतेच्या भावनांचा अपमान करणारे आहे.

मुख्यमंत्र्यांचे या वक्तव्याला समर्थन असल्यास त्यांनी तसे जाहीर करावे किंवा समर्थन नसल्यास मुख्यमंत्री महोदयांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. सोबतच मुखमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपले कर्तव्य प्रत्यक्ष मैदानात उतरून पार पाडावे असा सल्ला सुद्धा खासदार राणा यांनी दिला आहे. विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पिके वाहून गेली,घरेदारे पडली, गुरेढोरे वाहून गेली या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही खासदार राणा यांनी केली आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतnavneet kaur ranaनवनीत कौर राणा