शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:40 IST

कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यसभा खासदार संजय राऊत यांचे कंगनाबद्दलचे वक्तव्य म्हणजे समस्त महिलांचा अपमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आज मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने अभिनेत्री कंगना राणावत यांचे कार्यालय अनधिकृत म्हणून पाडले. अनेक वर्षांनंतर मनपाने ही कारवाई केली. कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. कंगनाने वक्तव्य केले त्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, संजय राऊत यांनी एका महिलेबद्दल अभद्र शब्दप्रयोग केला आहे, हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान आहे व याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर बसून कारभार चालवू नये.पूर्व विदर्भात भयानक पूरपरिस्थिती आहे. भंडारा-गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले आहे. बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी भटकत आहेत. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हॉस्पिटल मध्ये जागा नाही,आॅक्सिजन सिलेंडर नाहीत, मृत्यू वाढत आहेत या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानी आराम करीत आहेत व त्यांचे खासदार संजय राऊत हे खुलेआम महिलांचा अपमान करीत आहेत. मुख्यमंत्री निमूटपणे हा प्रकार बघून त्यांना पाठीशी घालत आहेत. हे सर्व अतिशय निंदाजनक असून जनतेच्या भावनांचा अपमान करणारे आहे.

मुख्यमंत्र्यांचे या वक्तव्याला समर्थन असल्यास त्यांनी तसे जाहीर करावे किंवा समर्थन नसल्यास मुख्यमंत्री महोदयांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. सोबतच मुखमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपले कर्तव्य प्रत्यक्ष मैदानात उतरून पार पाडावे असा सल्ला सुद्धा खासदार राणा यांनी दिला आहे. विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पिके वाहून गेली,घरेदारे पडली, गुरेढोरे वाहून गेली या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही खासदार राणा यांनी केली आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतnavneet kaur ranaनवनीत कौर राणा