शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वनक्षेत्राबाहेरील वाघांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रणाली लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 14:15 IST

वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.

ठळक मुद्देमानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक व्याघ्रभूमी असलेल्या विदर्भातील वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन धोक्यात आले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. जंगलांचा ऱ्हास, वाघांचे संकुचित झालेले संचार मार्ग अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव, नागझिरा व सह्याद्री यांचा समावेश आहे. मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पांतून वाघ बाहेर पडत नाहीत. मात्र, सन २०१७-२०१८ या वर्षांत राज्यात ६१ वाघांनी मानवावर हल्ले केल्याची नोंद लोकसभेतील अहवालातून स्पष्ट झाली आहे. वाघांच्या ६१ हल्ल्यांपैकी निम्म्याहून अधिक हल्ले चंद्रपूर जिल्ह्यात झालेत. गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथील हल्ल्यात वाघाने दोघांचा बळी घेतला. परिणामी, वन्यजीव विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. प्रादेशिक वनविभाग, वनविकास महामंडळांच्या क्षेत्रात वाघांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात ६९ अभयारण्यांतील वाघांवरही लक्ष केंद्रित केले आहे. सन २००४ मध्ये वाघांच्या व्यवस्थापनाविषयी नियोजन करण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. सन २०१८ मध्ये यात सुधारणा करण्यात आली असून, मानक संचालन प्रणालीद्वारे वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.नव्या अ‍ॅक्शन प्लॅनचे स्वरूपवन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करणे. वन्यप्राण्यांचे अस्तित्व असलेल्या क्षेत्रात अधिवास विकासाची कामे करणे. वन्यजीव संरक्षणासाठी गुप्तवार्ता- माहितीचे जाळे विणणे. वन्यजिवांच्या संरक्षणासाठी वनविभाग, वनविकास महामंडळ आणि वन्यजीव विभागाने समन्वय ठेवणे. जिल्हा व्याघ्र कक्षातर्फे संयुक्त गस्त. वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना. वन्यप्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे. वन्यजीव संरक्षणासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीची मदत घेणे. वन्यप्राणी उपसमिती नेमणे. वन्यप्राण्यांचा व्यापार रोखणे. मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना.नवीन अ‍ॅक्शन प्लॅनमुळे वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे सुकर होईल. वनविभागाच्या सर्वच यंत्रणांना समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे वाघ, बिबटसह अन्य वन्यजिवांच्या संरक्षणाला प्राधान्य असणार आहे.- सुनील लिमयेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.वनक्षेत्राबाहेरील वाघांच्या संरक्षणाची विदर्भात मोठी समस्या आहे. वाघांचे संचार मार्ग बंद झालेत. जे काही असतील, ते असुरक्षित आहेत. वाघांना मुक्त संचार करता येत नाही. नवीन रस्ते निमिर्तीत जंगलाशेजारील मार्गामध्ये भुयारी मार्गाची निर्मिती आवश्यक आहे, अन्यथा मानव- वन्यजीव संघर्ष कायम राहील.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

टॅग्स :Tigerवाघ