शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

नऊ दिवसात वीजबिल थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ ...

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय जुलै महिन्यात पहिल्या २२ दिवसांत ३७८ कोटींच्या उद्दिष्ठांपैकी ७७ कोटीच वसूल झाले. येत्या नऊ दिवसात किमान ८३.५४ कोटींच्या वसूलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे थेट निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी शुक्रवारी दिले. महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, भविष्यात थकबाकीदार ग्राहकांना उधारित वीज देणे महावितरणला शक्य नसल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून शंभर टक्के थकबाकी वसुलीचे निर्देश रंगारी यांनी दिले. महावितरणच्या विद्युत भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, उपमहाव्यवस्थापक (वित्त वे लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, भारतभूषण औगड, अनिरूध्द आलेगावकर, दीपक अघाव यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

राज्यातील वीजग्राहकांकडे ७२ हजार कोटींच्या घरात थकबाकी असताना महावितरणला ग्राहकाची विजेची गरज भागविण्यासाठी हजारो कोटींचे कर्ज काढावे लागत आहे. याचा परिणाम येत्या काळात वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही प्रादेशिक संचालक म्हणाले.

जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील ५ लाख ५० हजार वीज ग्राहकांकडून जुलै महिन्यात ३७८ कोटी वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आली. त्यापैकी २२ दिवसात केवळ १६.४६ टक्केच वसुली झाली आहे. त्यामुळे पुढील ९ दिवसात ८३.५४ टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक म्हणाले. याचाच भाग म्हणून काही अभियंतांवर कर्तव्यात कसूर करण्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकाकडून करण्यात आल्या आहे.

बॉक्स:

कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचा आढावा

उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी वीज जोडणीचा आढावा संचालकांनी घेतला आणि मार्च २०१८ पूर्वी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम सप्टेंबरपूर्वी करण्याच्या सूचना दिल्या. एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) व पंडित दिनदयाल उपाध्याय योजना पूर्ण झाल्या असून या योजनेंतर्गत उर्वरित कामे ३१ जुलैपर्यंत करण्यात यावी. यासोबतच जिल्ह्यातील आर- एपीडीआरपी टाऊनची वीज हानी सप्टेंबर महिन्यापर्यंत किमान चार टक्क्याने कमी करण्याबरोबरच अकृषक वर्गवारीतील पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांचे अर्ज महावितरणच्या नियमावलीनुसार निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचा आधार घेऊन त्यांनी आढावा घेतला, हे विशेष!