शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

By admin | Updated: April 25, 2015 00:27 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षण विभागाकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाला ..

आॅनलाईन प्रवेश : आतापर्यंत १५६४ पैकी ६४ प्रवेश निश्चितअमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षण विभागाकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाला आता खासगी शाळांडकडून टाळटाळ क रण्यात येत आहे. विशेष म्हणजे २५६४ पैकी केवळ ६४ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशच निश्चत केले आहेत. यामुळे मात्र पालकांची चांगलीच फरफट होत आहे.खासगी शाळांनी २५ टक्के प्रवेशास टाळाटाळ चालविल्याच्या विरोधात शिक्षण विभागानेही कडक भूमिका घेतली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी विद्यार्थ्याचे प्रवेश टाळणाऱ्या शाळांना अल्टिमेटम दिला आहे. शाळेची मान्यता काढण्याचा इशारा दिला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई यंदा शिक्षण विभागाने पहिल्यांदाच जिल्ह्यात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानुसार १९७ विनाअनुदानित, कायम अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जाती ,जमाती, ओबीसी, भटक्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेशाकरिता शहर व तालुका पातळीवर शिक्षण विभागाने केंद्र स्थापन केले होते. अंतिम प्रक्रियेपर्यंत १५६४ विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशास पात्र ठरले. नियमानुसार सर्व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविण्यात आली असताना १५६४ पैकी केवळ ६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला शाळांचा नकार दिसत आहे.आज अंतिम अल्टीमेटम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. प्रवेशास टाळाटाळ करणाऱ्या शाळांना २३ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत ज्या शाळांना प्रवेश दिला नाही अशा शाळांची मान्यता काढण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी दिली.