शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कारवाईचा इशारा, कृती केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:19 IST

यंदाच्या हंगामातील मूग व उडीद बाजार समित्यांमध्ये विक्रीला येताच व्यापाºयांनी भाव पाडले. हमीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास .....

ठळक मुद्देहमीपेक्षा कमी दराने खरेदी : मूग, उडीद संकटात, व्यापाºयांद्वारा लूट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामातील मूग व उडीद बाजार समित्यांमध्ये विक्रीला येताच व्यापाºयांनी भाव पाडले. हमीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास त्या व्यापाºयावर फौजदारी दाखल करू, असा इशारा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी रविवारी अकोला येथे दिला. यापूर्वी अमरावती येथे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यापूर्वी कित्येकदा व्यापाºयांवर कारवाईचे इशारे दिले. मात्र, आतापर्यंत एकाही व्यापाºयावर कारवाई झाली नसल्याने शेतकºयांची खुलेआम लूट होत आहे.यंदाच्या हंगामात मूग व उडीद आता बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत असताना आधारभूत किमतीपेक्षा १ हजार रूपये प्रती क्विंटलपेक्षा कमी दराने व्यापाºयांद्वारा खरेदी केली जात आहे. वास्तविक मागीलवर्षी याचवेळी मूग व उडिदाला सहा हजारावर भाव होता.यंदा मात्र मूग व उडदाला अवघ्या चार हजरांच्या आसपासच भाव मिळत आहे. यावर्षी मुगाला पाच हजार ३७५ रूपये प्रती क्विंटल हमीभाव व २०० रूपये क्विंटल बोनस जाहीर केला आहे. प्रत्यक्षात बाजारात मात्र ३५०० ते ४१०० दरम्यान दर मागिल महिनाभरापासून मिळत आहे.यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पाऊस गायब असल्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीत येणारे मूग व उडिदाचे पीक आधीच बाद झाले आहे. यामधून वाचलेल्या पिकांचा हंगाम आता सुरू झाला आहे. नवीन मूग व उडीद बाजारात येताच हमीपेक्षा कमी दराने व्यापाºयांद्वारा खरेदी करण्यात येत असल्याने उत्पादन खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाले असते तर खुल्या बाजारातील भावात घसरण देखील झाली नसती व शेतकºयांना हमीभावाचे संरक्षण कवच मिळाले असते. मात्र, तसे न होता शासन-प्रशासनाद्वारा केवळ व्यापाºयांवर कारवाईचे इशारे देण्यातच धन्यता मानली जात असल्याने व्यापाºयांचे फावत आहे.निर्यातीला परवानगी, भाववाढीची शक्यताकेंद्र शासनाने तूर, मूग व उडदाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. यासंधीचा फायदा घेऊन निर्यात सुरू झाल्यास या कडधान्याची भाववाढ होऊन शेतकºयांना दिलासा मिळू शकतो. पुणे येथे झालेल्या खरीप हंगाम आढावा सभेत राज्याचे कृषी व पणन् विभागाचे सचिव विजयकुमार यांनी याविषयी माहिती दिल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.दसºयानंतर सुरू होणार शासकीय केंद्रराज्यात नव्याने मूग व उडदाची आवक खुल्या बाजारात होत असताना दर हमीपेक्षा १ हजार रूपयांनी कोसळले आहेत. यासाठी केंद्र शासनाकडे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी व पणन विभागाने पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसली तरी लवकरच मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार राज्यात दसºयानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.