शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

२९ गावांची भिस्त विहीर अधिग्रहणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा व लवादा या ...

अमरावती : जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा व लवादा या दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात असल्याने अनेक तालुक्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची झळ कमी सोसावी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. तरीदेखील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईने डोके वर काढले आहे.

जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी प्रशासनाने आजघडीला १४ पैकी ७ तालुक्यांतील २९ गावांमध्ये गत मार्च महिन्यापासून ३२ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा केला आहे. अधिग्रहीत विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील एक ते दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता, त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या २९ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले तसेच ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्यावतीने विहिरी व बोरवेल अधिग्रहणाची कार्यवाही केली आहे.

बॉक्स

विहीर व बोअरचे अधिग्रहण झालेले गावे

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा, शेलूगुंड, पळसमंडळ, नागझरी, बोपी, पिंप्री गावंडा, चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अमरावती तालुक्यातील भानखेडा, माेगरा,कस्तुरा, यावली अंतर्गत नरसिंगपूर, इंदला, मौजे घातखेडा, बोडणा(परसोडा), देवरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा, नया सावंगा, निमला, अमदोरी, टेंभूर्णी, भातकुली तालुक्यातील दाढी पेढी, अचलपूर तालुक्यातील बोर्डी, वाल्मीकपूर, खतिजापूर, कासमपूर, कुंभी वाघोली, कुष्ठा बु.,परसापूर आदी गावांमध्ये विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले.

बॉक्स

दोन गावांना टँकरचा आधार!

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सद्यस्थितीत एकझिरा व लवादा या गावांत पाणीपुरवठ्याची समस्या तीव्र झाली असल्याने, या ठिकाणी दोन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बाहेर ठिकाणाहून पाणी आणून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.