शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

७७ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:49 IST

यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे जलस्रोताची पातळीही चांगलीच खालावली आहे. जिल्हाभरातील ३३१ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३८६ उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत १६२ योजनांची कामे झाली, तर २२४ उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देटंचाईच्या झळा : ३३१ गावांत ३८६ उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे जलस्रोताची पातळीही चांगलीच खालावली आहे. जिल्हाभरातील ३३१ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३८६ उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत १६२ योजनांची कामे झाली, तर २२४ उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.उन्हाची दाहकता चांगलीच वाढली आहे. परिणामी उकाडाही वाढला. अशातच पाण्याची मागणीही वाढली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे, अशा ठिकाणी पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार सध्या विहीर अधिग्रहण, कूपनलिका, टँकर यांसह अन्य उपाययोजना सुरू केल्या आहेत. या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.सध्या ६० गावांमध्ये ७७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातून वरील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. यासोबतच १६६ गावांमध्ये २०१ कूपनलिकांचा प्रस्ताव आहे. ६० गावांमध्ये नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. तीन गावांमध्ये पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४१ गावांमध्ये ४१ तात्पुत्या नळ योजनांच्या दुरुस्तीचे नियोजन केले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता रीतेश मुंडे यांनी दिली. जिल्ह्यातील विहिरी, बोअरवेल, तलावामधील जलस्तर चांगलाच खालावला आहे. परिणामी येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गडद होण्याची दाट शक्यता आहे.पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना होत आहेत. सध्या तीन गावांमध्ये पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहीर अधिग्रहण करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जात आहेत.- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग