शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अचलपूर, वरूड, अंजनगाव, दर्यापूर ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. सुरूवातील शहराचे तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप कमी होता.

ठळक मुद्देकोरोना वाढता प्रकोप : जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेता अचलपूर, वरूड, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर हे चार तालुके सध्या हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी ग्रामीण भागाची धूरा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग सांभाळत आहे.१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. सुरूवातील शहराचे तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप कमी होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चार तालुक्यासह अन्य तालुक्यातही आधीपासूनच रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळेच या तालुक्यांवर जिल्हा परिषदेने यापूर्वीच लक्ष केंद्रित केले होते. मागील काही दिवसांपासून अचलपूर, वरूड, अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर या तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ४० दिवसांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे १८७८ कोरोना संक्रमिताची नोंद ९ सप्टेबरचे सांयकाळपर्यत करण्यात आली आहे. त्यापैकी ११७७ रूग्णांनी या आजारावर यशस्वीपणे मातकेलेली आहे.जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यत ३३ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत अमरावती, अचलपूर, नांदगाव व इतर कोविड केंद्रांमध्ये ६६७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. सर्वाधिक ११४ रुग्ण अचलपूर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ वरुड तालुक्यात ७३, दर्यापूर ७१ आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. याशिवाय अन्य १० तालुक्यातील रूग्णांचा यामध्ये समावेश आहे.चार तालुक्यात काही दिवसात रूग्ण संख्या वाढलेली आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने सर्वच तालुक्यांकडे लक्ष केंद्रीत करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे.सीईओंच्या मार्गदर्शनात खबरदारीसाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.- डॉ. दिलीप रणमलेजिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या