शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘पंचायत राज’मध्ये अचलपूरची छाप

By admin | Updated: April 16, 2017 00:11 IST

यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अमरावती विभागात अव्वल : चांदूररेल्वे पंचायत समितीलाही पुरस्कारपरतवाडा / चांदूररेल्वे : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अचलपूर पंचायत समितीला राज्यात तिसरे, तर अमरावती विभागात पहिले स्थान मिळाले आहे. याशिवाय चांदूररेल्वे पंचायत समितीला विभागातून दुसरे स्थान मिळाले आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव सुमित मलिक, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सभापती व उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सन २०१५-१६ या कालावधीत अचलपूर पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यातून तिसरे स्थान मिळविले आहे. राज्यातून तिसरे स्थान मिळविल्याबद्दल तृतीय क्रमांकाचे १५ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. अमरावती विभागातून प्रथम स्थान मिळविल्याबद्दल ११ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंचायत समितीचे सभापती देवेंद्र पेटकर व इतर पदाधिकारी, गट विकास अधिकारी, सहा गटविकास अधिकारी डब्ल्यू एम कनाटे, विकल मेहरा, नितीन पवार, आकाश फुसकुलवाड, राजेंद्र काळे, आशिष निमकर, भैय्या काकडे, जुनेद बंग, दीपक टाले उपस्थित होते. पंचायत समितीने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यामुळे तालुक्यात विकासकामे गतीने होतील. - बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी, अचलपूर चांदूर रेल्वे विभागात द्वितीय यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत चांदूररेल्वे पंचायत समितीला अमरावती विभागातून द्वितीय स्थान मिळाले आहे. आठ लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराला पंचायत समिती सभापती किशोर झाडे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, सहा. गटविकास अधिकारी सोनाली मानकर यांच्यासह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे याच्या हस्ते स्वीकारला. चांदूररेल्वे पं.स.ने यशंवत पंचायत राज अभियानात सन २०१२-१३ पासून सलग पाच वेळा सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. तीन वेळा सलग प्रथम पुरस्कार प्राप्त करीत हॅट्ट्रिक नोंदविली आहे. (तालुका प्रतिनिधी)