शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचायत राज’मध्ये अचलपूरची छाप

By admin | Updated: April 16, 2017 00:11 IST

यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अमरावती विभागात अव्वल : चांदूररेल्वे पंचायत समितीलाही पुरस्कारपरतवाडा / चांदूररेल्वे : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अचलपूर पंचायत समितीला राज्यात तिसरे, तर अमरावती विभागात पहिले स्थान मिळाले आहे. याशिवाय चांदूररेल्वे पंचायत समितीला विभागातून दुसरे स्थान मिळाले आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव सुमित मलिक, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सभापती व उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सन २०१५-१६ या कालावधीत अचलपूर पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यातून तिसरे स्थान मिळविले आहे. राज्यातून तिसरे स्थान मिळविल्याबद्दल तृतीय क्रमांकाचे १५ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. अमरावती विभागातून प्रथम स्थान मिळविल्याबद्दल ११ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंचायत समितीचे सभापती देवेंद्र पेटकर व इतर पदाधिकारी, गट विकास अधिकारी, सहा गटविकास अधिकारी डब्ल्यू एम कनाटे, विकल मेहरा, नितीन पवार, आकाश फुसकुलवाड, राजेंद्र काळे, आशिष निमकर, भैय्या काकडे, जुनेद बंग, दीपक टाले उपस्थित होते. पंचायत समितीने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यामुळे तालुक्यात विकासकामे गतीने होतील. - बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी, अचलपूर चांदूर रेल्वे विभागात द्वितीय यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत चांदूररेल्वे पंचायत समितीला अमरावती विभागातून द्वितीय स्थान मिळाले आहे. आठ लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराला पंचायत समिती सभापती किशोर झाडे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, सहा. गटविकास अधिकारी सोनाली मानकर यांच्यासह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे याच्या हस्ते स्वीकारला. चांदूररेल्वे पं.स.ने यशंवत पंचायत राज अभियानात सन २०१२-१३ पासून सलग पाच वेळा सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. तीन वेळा सलग प्रथम पुरस्कार प्राप्त करीत हॅट्ट्रिक नोंदविली आहे. (तालुका प्रतिनिधी)