शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

‘पंचायत राज’मध्ये अचलपूरची छाप

By admin | Updated: April 16, 2017 00:11 IST

यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अमरावती विभागात अव्वल : चांदूररेल्वे पंचायत समितीलाही पुरस्कारपरतवाडा / चांदूररेल्वे : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अचलपूर पंचायत समितीला राज्यात तिसरे, तर अमरावती विभागात पहिले स्थान मिळाले आहे. याशिवाय चांदूररेल्वे पंचायत समितीला विभागातून दुसरे स्थान मिळाले आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव सुमित मलिक, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सभापती व उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सन २०१५-१६ या कालावधीत अचलपूर पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यातून तिसरे स्थान मिळविले आहे. राज्यातून तिसरे स्थान मिळविल्याबद्दल तृतीय क्रमांकाचे १५ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. अमरावती विभागातून प्रथम स्थान मिळविल्याबद्दल ११ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंचायत समितीचे सभापती देवेंद्र पेटकर व इतर पदाधिकारी, गट विकास अधिकारी, सहा गटविकास अधिकारी डब्ल्यू एम कनाटे, विकल मेहरा, नितीन पवार, आकाश फुसकुलवाड, राजेंद्र काळे, आशिष निमकर, भैय्या काकडे, जुनेद बंग, दीपक टाले उपस्थित होते. पंचायत समितीने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यामुळे तालुक्यात विकासकामे गतीने होतील. - बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी, अचलपूर चांदूर रेल्वे विभागात द्वितीय यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत चांदूररेल्वे पंचायत समितीला अमरावती विभागातून द्वितीय स्थान मिळाले आहे. आठ लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराला पंचायत समिती सभापती किशोर झाडे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, सहा. गटविकास अधिकारी सोनाली मानकर यांच्यासह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे याच्या हस्ते स्वीकारला. चांदूररेल्वे पं.स.ने यशंवत पंचायत राज अभियानात सन २०१२-१३ पासून सलग पाच वेळा सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. तीन वेळा सलग प्रथम पुरस्कार प्राप्त करीत हॅट्ट्रिक नोंदविली आहे. (तालुका प्रतिनिधी)