शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

एका अग्निशमन यंत्रावर अचलपूरची मदार

By admin | Updated: September 15, 2015 00:13 IST

बारूदच्या ढिगाऱ्यावर असलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीची मदार एकाच अग्निशमन ंअसून त्याही वाहनाला जिल्हाभर सतत मागणी होत आहे.

अपघात घडल्यास जबाबदार कोण?: दोन कालबाह्य वाहने धावताहेत रस्त्यावरलोकमत विशेषनरेंद्र जावरे अचलपूरबारूदच्या ढिगाऱ्यावर असलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीची मदार एकाच अग्निशमन ंअसून त्याही वाहनाला जिल्हाभर सतत मागणी होत आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील शहर वाऱ्यावर सुटल्याचे धक्कादायक चित्र आहे.दीड लाखांवर लोकसंख्या असलेल्या अचलपूर-परतवाडा या जुळ्यानगरीत कुठलीही अप्रिय घटना घडल्यास वेळेवर अग्निशमन वाहन उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शासनाने तत्काळ दुसऱ्या अग्निशमन वाहनाची परवानगी व त्याकरिता आवश्यक मनुष्यबळ भरती प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी नगरपालिकेने नुकताच झालेला सर्वसाधारण सभेत एक ठराव घेतला. भंगार वाहने रस्त्यावरराज्यातील मोजक्याच नगरपालिकांपैकी ‘अ’ वर्ग असलेल्या अचलपूर नगरपालिकेने २८ वर्षांपूर्वी अग्निशमन वाहनाची खरेदी केली होती. एम. जी. एस. १०८२ क्रमांकाचे वाहन आता कालबाह्य झाले आहे. ते प्रमुख उद्देश असलेल्या आग विझविण्याच्या कुठल्याच कामासाठी वापरण्यास योग्य नसल्याचा शेरा तपासणी अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर एमएच २७-४९६० हे दुसरे वाहन १८ वर्षांपूर्वी नगरपालिकेत दाखल झाले. तेसुद्धा कालबाह्य असल्याचा शेरा नगरपरिषदेच्या दप्तरी तपासणी अधिकाऱ्यांनी दिल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना ही दोन्ही कालबाह्य झालेली भंगार वाहने जुळ्या नगरीच्या गल्लीबोळातून विनाकर्मचाऱ्यांची धावत आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची मंजुरात नसल्याने कालबाह्य अर्थात् निकामी ठरलेली अग्निशमन वाहने संकटाचा कसा सामना करतील, पालिका प्रशासनाने हा देखावा बंद करण्याची नियमानुसार गरज आहे. एक वाहन जिल्हाभर मागणीअचलपूर नगरपालिकेत एमएच २७ ए. ५१११ क्रमांकाचे नवीन अग्निशमन वाहन २०१२ मध्ये राज्य शासनातर्फे दाखल झाले. त्यामुळे जुळ्या शहरातील सुरक्षिततेची जबाबदारी या नवीन वाहनावर आल्याने जुळ्या शहरवासीयांना त्यावेळीच आपत्कालीन घटनेचा निपटारा करण्यासाठी अच्छे दिन आल्याचा आनंद झाला. मात्र तो दीर्घकाळ टिकू शकला नाही. या नवीन वाहनाची मागणी संकटकाळी मोर्शी, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार आदी तालुक्यामध्ये होऊ लागली आहे. परिणामी जुळ्या शहरात अशावेळी काही अप्रिय घटना घडल्यास कुठलीच व्यवस्था नसल्याने त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परतवाडा-अचलपुरात भांडणसद्यस्थितीमध्ये अग्निशमनाचे एकच वाहन असल्याने ते वाहन परतवाडा शहरातील अचलपूर नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात ठेवायची की अचलपूर शहरातील लहान नगरपालिका कार्यालयात यावर सभागृहामध्ये दोन्ही शहराच्या नगरसेवकांमध्ये बऱ्याचदा खडाजंगी झाली आहे. सदर वाहन हे अचलपूर शहराच्या नावाने राज्य शासनाने पाठविण्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. मुख्यालय परतवाडा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही दिवस अचलपूर शहरातील हे अग्निशमन वाहन आता परतवाड्यातील मुख्य कार्यालयात उभे आहे.नवीन इमारत शोभेची वास्तूपरतवाडा शहरातील नगरपालिका मुख्यालयात अग्निशमन वाहनासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे अचलपूर शहरात अग्निशमन वाहनासाठी लाखो रूपये खर्चून स्वतंत्र अशी इमारत शासकीय निधीतून उभारण्यात आली आहे. विना वाहनाची ही इमारत शोभेची वास्तू ठरली आहे. या इमारतीमध्ये अचलपूर शहरासाठी अत्यावश्यक असलेले अग्निशमन वाहन देण्याची गरज आहे. बारुदच्या ढिगाऱ्यावरील या शहरात केव्हाही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा इतिहास आहे. तेव्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच त्याची दखल घेण्याची गरज आहे.अपुरा अप्रशिक्षित कर्मचारी वर्गअचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात प्रत्यक्षात तीन वाहन असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी दोन वाहन पूर्णत: कालबाह्य झाली आहे. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरासह आसपासच्या तालुक्यात घटना घडल्यास येथील वाहन तत्काळ पाठविण्यात येते. मात्र त्या वाहनावर सुद्धा अपुरा अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ‘एक ना घड भाराभर चिंध्या’ असा काहीसा जीवघेणा प्रकार जुळ्या नगरीत सुरू आहे. पालिकेत आकृतीबंध आराखड्यानुसार १४ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये १२ कर्मचारी कार्यरत असून ५ फायरमन प्रशिक्षित असणे गरजेचे असताना उद्धव पुरी, किशोर सहारे व प्रताप भिसे हे तिघेच प्रशिक्षित आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी एकाला अपंगत्व आले आहे. दोन चालक असून मदतनिस व टेलीफोन आॅपरेटर असे आहेत. प्रत्यक्षात घटनास्थळी जाण्यासाठी बोटावर मोजकेच कर्मचारी पालिकेजवळ असल्याचे सत्य आहे. नवीन ठरावात केली मागणीजुळ्या शहरात पाच किमीचे अंतर असून शहराचा आराखडा पाहता गल्लीबोळातील रस्त्यामुळे आगीपासून जिवीत व वित्तीय हानीची शक्यता आहे. त्यामुळे शहराला या घटनेपासून वाचविण्यासाठी अचलपूर शहर विभागाला स्वतंत्र अग्निशमन सेवा देण्याची मागणी करणारा ठराव पालिकेने ४ सप्टेंबरच्या सभेत घेतला आहे. त्या वाहनावर कर्मचारी पदभरतीसाठी मंजुरात देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये वाहन चालक आॅपरेटर ४ जागा, फायरमन चार, हेल्पर ४, दूरध्वनी सहा. दोन अशी मागणी केली आहे.