शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या परीक्षेत अचलपूर नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST

परतवाडा : अचलपूरचे प्रशासन कोरोनाच्या परीक्षेत नापास झाले आहे. राज्य शासनाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्या पाहणी दौऱ्यात ...

परतवाडा : अचलपूरचे प्रशासन कोरोनाच्या परीक्षेत नापास झाले आहे. राज्य शासनाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्या पाहणी दौऱ्यात प्रशासन आवश्यक किमान गुणही मिळू शकले नाही.

अचलपूरमधील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या बघता, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशनुसार डॉ. सुभाष साळुंके १६ फेब्रुवारी रोजी अचलपूर मध्ये दाखल झाले होते. त्यांनी अचलपूर, परतवाडा शहरांसह देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अचलपूर सर्कीट हाऊसवर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत ‘व्हॉट्सॲपप्रेमी’ अधिकाऱ्यांनी प्रशासनाची कार्यतत्परता त्यांच्यापुढे ठेवली. मात्र, नागरिकांना दोष देत जबाबदारी टाळणारे डॉ. साळुंके यांच्यापुढे उघडे पडले. कोरोनाच्या तयारीत प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष अगदी मवाळ भाषेत त्यांनी बैठकीत उघड केले. क्षेत्र भेटीदरम्यान कुणाच्याही तोंडाला त्यांना मास्क दिसला नाही. देवमाळीत काही घरांना प्रत्यक्ष भेटीत त्यांना गृह विलगीकरणाची योग्य व्यवस्था आढळून आली नाही. ज्यांना होम क्वारंटाईन केले आहेत, ते घरी आढळून आले नाहीत. खुलेआम शहरात भटकताना ते त्यांना दिसले. नागरिकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

परतवाडा शहरातील कल्याण मंडपम् येथील कोरोना केंद्राला डॉ. साळुंके यांनी भेट दिली. तेव्हा तेथील दुरवस्था स्वच्छतेचा अभाव बघून तेथील कोरोना संक्रमितांना इतरत्र हलविण्याचे निर्देश दिले. अगदी शहराबाहेर दूरवर बुरडघाट येथील आश्रमशाळेतील कोरोना केंद्रालाही त्यांनी भेट दिली. डेडिकेटेड कोविड रुग्णालय परिसराचेही त्यांनी अवलोकन केले.

कोरोना केंद्र पाहून संताप

कोरोना उपचार केंद्रावर रुग्णांना योग्य तो उत्तम आहार द्या. बेचव जेवण देऊ नका. चहा, नाष्टा आणि जेवणाच्या वेळा पाळा. कोरोना केंद्रावर मनोरंजनाकरिता टीव्हीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कल्याण मंडपम् येथील दुरवस्था व अस्वच्छता बघून ते संतापले. याठिकाणी रुग्ण ठेवू नका, येथून रुग्णांना हलवा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

थेट सीएमओला माहिती

अचलपूरची ही कीर्ती डॉ. साळुंके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानीही टाकली. एवढेच नव्हे तर अचलपूर दौऱ्याप्रसंगी शासन सतत डॉ. साळुंके यांच्या संपर्कात होते. त्यांनी आपल्या पाहणी दौऱ्यातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनादेखील दिली.

--------