शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्ह्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST

अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता.

ठळक मुद्देबच्चू कडू । प्रशासकीय प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण, प्रस्ताव पहिल्या पाचमध्ये

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर जिल्ह्याची मागणी सन १९८० पासून असली तरी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव प्रशासकीय स्तरावरून शासनदरबारी दाखल झाला. अचलपूर जिल्हा निर्मितीच्या या प्रस्तावाने प्रशासकीय स्तरावरील सर्व टप्पे पूर्ण केले असून, अचलपूर जिल्हा निर्मितीच्या पंगतीत शासनदरबारी पहिल्या पाचमध्ये पोहोचलेला आहे.अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता. अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठविल्याबाबत प्रशासनाने आमदारांना आश्वस्त केले. या अनुषंगाने १८८.४१ कोटींच्या अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी तालुक्यांसह आसेगाव आणि चुरणी या दोन नवे तालुके प्रस्तावित आहेत. सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली गेली. १८६७ ते १९०५ पर्यंत इंग्रज राजवटीत अचलपूर जिल्हा अस्तित्वात असल्याचे यात स्पष्ट केले गेले.प्रशासकीय दृष्टिकोन व जनहिताच्या सोयी-सवलती लक्षात घेता, अमरावती जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचा अभिप्रायही प्रशासनाने दिला. भौगोलिक दृष्टिकोनातून अचलपूर हे नवीन जिल्हा मुख्यालयाकरिता योग्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. आ. कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे फलित ठरले.दिवाळीला आंदोलन, ४१२ दिवस साखळी उपोषणअचलपूर जिल्हा व्हावा, याकरिता आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ रोजी ५०० कार्यकर्त्यांसमवेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. नंतर दुसऱ्या दिवसापासून प्रहारने याच मागणीकरिता ४१२ दिवस साखळी उपोषण केले. यात १५५ गावांतील युवकांनी सहभाग नोंदविला, तर तब्बल १० हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. अचलपूर जिल्ह्याच्या मागणीकरिता ते एकमेव असे पहिले रचनात्मक आंदोलन ठरले. या आंदोलनाची दखल तत्कालीन सरकारनेही घेतली होती. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बच्चू कडूंसह प्रहारच्या शिष्टमंडळासोबत अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने चर्चा केली होती.सात वेळा सकारात्मक चर्चाप्रशासनाकडून शासनदरबारी सादर अचलपूर जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावाचा आमदार बच्चू कडू यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. मुख्यमंत्र्यांशी या अनुषंगाने बच्चू कडू यांची सात वेळा सकारात्मक चर्चा झाली. राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण राबविताना अचलपूरचा निर्णय घेतला जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना आश्वस्त केले आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू