शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर न्यायालयाने श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

फोटो ०५एएमपीएच०९ - एम.एस. रेड्डी परतवाडा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज ...

फोटो ०५एएमपीएच०९ - एम.एस. रेड्डी

परतवाडा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज बुधवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एम.एस. मुनगीनवार यांच्या न्यायालयाने फेटाळला. याच न्यायालयाने रेड्डींचासुद्धा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज ३ मे रोजी फेटाळला होता. श्रीनिवास रेड्डी यांच्या जामिनासाठी आयएफएस लॉबीतील एक गट पूर्णत: सक्रिय झाल्याची चर्चा अचलपूर न्यायालय परिसरात होती. जामीन फेटाळल्याची माहिती होताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामिनासाठी आवश्यक कार्यवाहीसंबंधी धावपळ दिसून आली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांना नागपूर येथून बुधवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली होती. धारणी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठवल्याने पाच दिवसांपासून ते जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या तात्पुरत्या कारागृहात आहेत. त्यांच्या वकिलांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी बुधवारी ‘से‘ दाखल करीत युक्तिवाद केला. त्यांना सहायक सरकारी अभियोक्ता भोला चव्हाण, डी.ए. नवले, गोविंद विचोरे यांनी सहकार्य केले. मात्र, तपास अधिकारी किंवा धारणी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित नव्हते, हे विशेष.

बॉक्स

चार्जशिट दाखल होईपर्यंत जामीन नको

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण खूप गंभीर आहे. दीपाली यांना साधारणत: एक वर्षापेक्षा अधिक काळ मानसिक त्रास देण्यात आला, असे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट आहे. या वर्षभराच्या कालावधीत काय-काय झाले, याचा तपास सुरू आहे. साक्षीदारांचे बयाण, जबाब नोंदवणे सुरू आहे. तपास पूर्ण झालेला नाही. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही किंवा चार्जशिट न्यायालयात दाखल होत नाही, तोपर्यंत किमान जामीन देऊ नये, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी न्यायालयासमोर मांडला. पोलीस तपासाला केवळ ४० दिवस झाले. अशात जामीन दिल्यास तपास कामात अडथळा व साक्षीदारांवर दबाव टाकून फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेसुद्धा न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळला.

बॉक्स

अटक झाली, आता जामीन द्या

अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर नागपूर येथून अटक करण्यात आली. पीसीआरसुद्धा घेण्यात आला. पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला पोलीस कोठडीची गरज नसल्याने तुम्हीच न्यायालयीन कोठडीत पाठविले. श्रीनिवास रेड्डी हे वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे कुठे पळून जाणार नाहीत. ते कुठे राहतात, याची सर्व माहिती तुमच्याकडे आहे. तपासात सहकार्य केले आहे. आता तपास सुरू आहे. त्याला भरपूर वेळ लागेल. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल होईल. तोपर्यंत विनाकारण न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे प्रयोजन काय, असा श्रीनिवास रेड्डींच्या वकिलांनी युक्तिवाद करीत जामीन देण्यास काहीच हरकत नसल्याची बाजू मांडली.

बॉक्स

‘से‘साठी मध्यरात्रीच धारणीतून आली डायरी

रेड्डी यांच्या जामिनासाठी मंगळवारी अर्ज दाखल झाल्यावर न्यायालयाने बुधवारी ‘से‘ दाखल करण्याचे आदेश दिले. धारणीचे अंतर पाहता बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिसांची डायरी येण्याची शक्यता होती. त्यानंतर जिल्हा सरकारी अभियोक्त्यांकडून युक्तिवादासाठी पुढची तारीख घेतली जाण्याची शक्यता होती. परंतु, कधी नव्हे तेवढी तत्परता दाखवित पोलिसांनी मध्यरात्रीपूर्वीच आवश्यक कागदपत्रे असलेली डायरी अचलपुरात पोहचविली आणि जामीन अर्जावर वकिलांचा युक्तिवाद झाला. तपास अधिकाऱ्यांनी पूर्वी सात दिवसांची मागितलेली पोलीस कोठडी व दुसऱ्यांना धारणी न्यायालयात हजर केल्यावर थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने पोलिसांचा तपास चर्चेत असताना, बुधवारी तत्परतेने आलेली डायरी व अनुपस्थित तपास अधिकारी हेदेखील चर्चेचा विषय ठरले.

बॉक्स

नागपुरातून न्यायालयातून जामिनासाठी आयएफएस लॉबी सक्रिय

अचलपूर न्यायालयातून श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन रद्द झाल्यास तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज करण्यासाठी श्रीनिवास रेड्डींच्या बचाव समर्थनार्थ आयएफएस लॉबीचा एक गट सक्रिय झाल्याची माहिती आहे. रेड्डींना तात्काळ जामिनावर बाहेर काढण्याचे प्रयत्न याच लॉबीने गत आठवड्यापासून सुरू केले. अचलपूर न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता पूर्वीच वर्तवित जामिनासाठी या गटाने पुढील तयारी केल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती.