शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अचलपूर बाजार समितीची न्यायालयात धाव

By admin | Updated: November 15, 2014 22:39 IST

दोन महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे कारण पुढे करीत त्वरित निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

सुनील देशपांडे - अचलपूरदोन महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे कारण पुढे करीत त्वरित निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. राज्यातील सरकार बदलल्याने प्रशासकीय मंडळाचे सदस्य बदलू शकतात, म्हणून बाजार समितीच निवडणुका त्वरित घेण्यासाठी जोरात हालचाली सुरु झाल्या व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.ग्रामीण राजकारणाचा कणा असलेली अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी राजकीय चर्चेत असते. ग्रामीण भागातील राजकारणाची सूत्रे येथून हलविली जातात. या समितीवर ज्याचे वर्चस्व त्याच्या हातात ग्रामीण राजकारण असते. यासाठी या समितींवर निवडणूक घेण्यासाठी राजकीय गटातटांची चढाओढ असते. काही दिवसांपासून येथे उलथापालथ सुरु आहे. या समितीचा जून २०११ मध्ये कार्यकाळ संपला आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने काही तांत्रिक कारणे पुढे करून समितीच्या संचालक मंडळाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही निवडणूक याद्यांचा घोळ झाल्याने निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला नाही. संचालकांची मुदतवाढ संपल्याने आॅगस्ट २०१४ मध्ये समितीवर प्रशासक नेमण्यात आले. प्रशासक म्हणून एस.टी. केदार यांची निवड करण्यात आली. या मंडळात अनेकांनी राजकीय वजन खर्च करुन आपली वर्णी लावण्याचा जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. तत्कालीन संचालक मंडळाने प्रशासक न बसवता निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्कालीन संचालक मंडळ पायउतार झाले. त्यामुळे प्रशासक म्हणून पुन्हा एस.टी. केदार यांनी सूत्रे हाती घेतली होती. दरम्यान शासनाने अचलपूर उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ बसविले.या प्रशासकीय मंडळाला समितीचे ठोस निर्णय घेता येत नसल्याने शेतकरी हितासाठी निवडणूक घेऊन सत्ता हाती घेणे योग्य असल्याचे मंडळातील काही सदस्यांचे मत होते. यानुसार बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्यावतीने राजाभाऊ पाटील व कैलास आवारे यांच्यासह आदींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.