शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

अचलपूर बाजार समितीची न्यायालयात धाव

By admin | Updated: November 15, 2014 22:39 IST

दोन महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे कारण पुढे करीत त्वरित निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

सुनील देशपांडे - अचलपूरदोन महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे कारण पुढे करीत त्वरित निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. राज्यातील सरकार बदलल्याने प्रशासकीय मंडळाचे सदस्य बदलू शकतात, म्हणून बाजार समितीच निवडणुका त्वरित घेण्यासाठी जोरात हालचाली सुरु झाल्या व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.ग्रामीण राजकारणाचा कणा असलेली अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी राजकीय चर्चेत असते. ग्रामीण भागातील राजकारणाची सूत्रे येथून हलविली जातात. या समितीवर ज्याचे वर्चस्व त्याच्या हातात ग्रामीण राजकारण असते. यासाठी या समितींवर निवडणूक घेण्यासाठी राजकीय गटातटांची चढाओढ असते. काही दिवसांपासून येथे उलथापालथ सुरु आहे. या समितीचा जून २०११ मध्ये कार्यकाळ संपला आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने काही तांत्रिक कारणे पुढे करून समितीच्या संचालक मंडळाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही निवडणूक याद्यांचा घोळ झाल्याने निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला नाही. संचालकांची मुदतवाढ संपल्याने आॅगस्ट २०१४ मध्ये समितीवर प्रशासक नेमण्यात आले. प्रशासक म्हणून एस.टी. केदार यांची निवड करण्यात आली. या मंडळात अनेकांनी राजकीय वजन खर्च करुन आपली वर्णी लावण्याचा जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. तत्कालीन संचालक मंडळाने प्रशासक न बसवता निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्कालीन संचालक मंडळ पायउतार झाले. त्यामुळे प्रशासक म्हणून पुन्हा एस.टी. केदार यांनी सूत्रे हाती घेतली होती. दरम्यान शासनाने अचलपूर उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ बसविले.या प्रशासकीय मंडळाला समितीचे ठोस निर्णय घेता येत नसल्याने शेतकरी हितासाठी निवडणूक घेऊन सत्ता हाती घेणे योग्य असल्याचे मंडळातील काही सदस्यांचे मत होते. यानुसार बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्यावतीने राजाभाऊ पाटील व कैलास आवारे यांच्यासह आदींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.