शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आरोपी विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर ...

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर गुरुवारी अचलपूर येथील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. न्यायालय शुक्रवारी त्यावर निर्णय देणार आहे.

दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. पीसीआरनंतर त्याची ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी अभियोक्ता प्रशांत देशपांडे यांनी अचलपूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर १९ एप्रिल रोजी सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता भोला चव्हाण व तपास अधिकारी पूनम पाटील यांनी ‘से‘ दाखल केला. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. सहकारी सरकारी अभियोक्ता बी. आर चव्हाण, गोविंद विचोरे यांनी सहकार्य केले.

बॉक्स

जंगल संरक्षण कामासाठी बोलावणे कर्तव्याचा भाग

प्रोटोकॉल नुसार उपवनसंरक्षक जेथे जातो तेथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जावे लागते. जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. केवळ कामासंदर्भात विनोद शिवकुमार बोलले, तो कर्तव्याचा भाग आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करावी, असा कुठलाच उद्देश विनोद शिवकुमार यांचा नव्हता, असे मत वकील प्रशांत देशपांडे यांनी मांडले. विनोद शिवकुमार हे कर्तव्यदक्ष व मेहनती अधिकारी होते. दीपाली चव्हाण सांगितलेल्या कामकाजाची माहिती सादर करत नव्हत्या. शिवकुमार सरकारी अधिकारी आहेत. त्यांचे मुख्यालय नागपूर येथे केल्याने पळून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते वेळोवेळी तपास कामाला मदत करतील. २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद प्रशांत देशपांडे यांनी केला.

बॉक्स

दीपालीने चिट्टीत लिहिले "मी कंटाळले"

दीपाली चव्हाण यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत थेट आरोप केले आहेत. त्यामुळे विनोद शिवकुमार यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, ते स्पष्ट होते त्यावरुनच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घटना घडताच पळून गेला. अपराधी कृत्य करणे हा सुद्धा ड्युटीचा भाग होऊ शकत नाही. एक वर्षापासून दीपाली चव्हाण यांना त्रास दिला जात होता. त्यामुळेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘मी कंटाळले’ असे लिहिले आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता तपास अजून सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात बसून साक्षीदारांवर दबाव टाकून फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामीन अर्ज खारीज करण्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता परिक्षित गणोरकर यांनी न्यायालयात केला.