शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

आरोपींवर 'मोक्का' नाही

By admin | Updated: August 30, 2015 00:07 IST

अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली.

अमित बटाऊवाले खून प्रकरण : पोलीस अधीक्षकांची माहितीअमरावती/अचलपूर : अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली. पण मोक्का लावण्याएवढे त्यांचेवर गुन्हे दाखल नसल्याने मोक्का लावणे कायद्यात बसत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ‘लोेकमत’शी बोलताना दिली.रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची भरदिवसा रस्त्यावर हत्या केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पहिलीच शांतता समितीची सभा अचलपूर पोलीस ठाण्यात झाली. त्यासाठी लखमी गौतम येथे आले होते. त्यानंतर त्यांची लोकमत प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांचेशी भेटायला गर्दी केली होती. तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमितच्या घरी जाऊन त्याची आई अनिता मोहन बटाउवाले ह्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझा मुलगा अमित याच्या हत्याऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तेथे जमलेल्या लोकांनीही हीच मागणी लावून धरली होती. सदर बारुद गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु झाल्याची माहिती आहे.गौतम म्हणाले की, अजूनही अमित हत्याकांडातील दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते जर सापडलेच नाही तर त्यांच्या मालमत्ते संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेते अज्जूभाई ह्यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाला गौतम ह्यांनी उत्तर देतांना सांगितले की, गुन्हेगारावर कारवाई ही केलीच जाईल, त्याची हयगय नाही. पण सामान्य माणसांना त्रास होणार नाही. त्यांनी घाबरु नये. कुठलीही समस्या अडचण असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. कुठलीही भीती बाळगू नये. शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना गौतम आपल्या भाषणातून म्हणाले की, शाळा व महाविद्यालयांजवळ विद्यार्थिनीची छेडखानी होणार नाही. याची पोलीस विशेष दक्षता घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहन परवाना तपासणी सुरु असून ज्यांच्याजवळ परवाना नाही त्यांच्या आई-वडिलांना बोलावून दंड करा तसेच शहरात शांतता व सलोखा ठेवा यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. ज्यांचेवर गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींना शांतता समितीतून काढण्यात येणार आहे. येणारा कुठलाही सण उत्साहात, शांततेत व एकोप्याने साजरा करा असेही आवाहन त्यांनी शेवटी केले. (प्रतिनिधी)महसूल विभाग अजूनही झोपेतअमित बटाऊवाले ह्यांची हत्या रेती तस्करांनी केली. अचलपूर तालुक्यात कोट्यावधी रुपयाची रेती तस्करी झाली आहे. रेती तस्करापासून आपल्या जिवाला धोका आहे. परंतू संबंधीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुटपूंजी कारवाई करत बनवाबनवी केली. संबंधीत अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा मलीदा खाल्ला त्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेचे विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख उपेन बछेल ह्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर ह्यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. तसेच बटाउवाले कुटूंबियांना १० लाख रुपयाची शासनाने मदत करावी असेही निवेदनात नमुद केले आहे. निवेदनावर रविंद्र गवई, चेतन बाळापूरे, विठ्ठल पाटील, मंगेश सदांशिव, सुभाष देशमुख, प्रशांत अग्रवाल, चिंटू अग्रवाल, बजरंग हेकडे, ऋषी नंदवंशी ह्यांचे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.