शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कौंडण्यपूरच्या पालखीला पंढरपूरजवळ अपघात

By admin | Updated: July 5, 2014 00:30 IST

विदर्भाची पंढरी असलेल्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पादुका ...

अमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पादुका असणाऱ्या पालखीला गुरूवारी रात्री पंढरपूर नजीक आढीव गावाजवळ अपघात झाला. जेवण करून रात्रीच्या विश्रांतीला वारकरी रस्त्याने जात असताना पालखीसमोर ट्रकने इंडिकाला धडक दिली. या अपघातामधील इंडिका फिरून पालखीत शिरली. या अपघातात २ वारकरी ठार व ३ जखमी झाले आहे. मृतामध्ये तिवसा तालुक्यामधील मार्डा येथील इंदुमती धोत्रे (६४) व उमेश बावनथडे (३५, रा. मार्डी) यांचा समावेश आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या ३ वारकऱ्यांवर सोलापूर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष वासुदेवराव दोड यांनी सांगितल्यानुसार संत सदाराम महाराजांनी ४१९ वर्षांपूर्वी ही पालखी सुरू केली होती. यावर्षी हभप रंगराव महाराज टापरे यांच्या नेतृत्वात दि. १ जून २०१४ पालखीची सुरवात झाली. यावेळी पालखीत ४० वारकरी होते. गावागावात वारकरी जुळत गेल्याने ही संख्या १४० वर गेली. पंढरपूरच्या काही किलोमीटर अगोदर आढीव या गावामध्ये गुरूवारी रात्री जेवण करून गावाबाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विश्रांती वारकरी जात असताना समोरील भागात ट्रकने इंडीकाला धडक दिली. ही इंडिका फिरून मागे आली व पालखीवर धडकली. यामध्ये २ वारकरी ठार झालेत. मृतकांना शुक्रवारी सायंकाळी अमरावती येथे आणण्यात आले आहे. (प्रतिनिधी)