शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

गुन्हेगार आश्रमाशी परिचित

By admin | Updated: August 12, 2016 00:12 IST

सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत.

अमरावती : सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत. ज्याच्या मनावर गुन्हेगारीचा खोलवर पगडा असेल, गुन्हेगारीच्या छटा ज्याला परिचित असतील, अशा व्यक्तिने हे वार केलेले असावेत, असे मत मानसतज्ज्ञांचे आहे. मानेवर वार करणे सहजसाध्य प्रक्रिया नाही. या हल्ल्यात त्यामुळेच एकापेक्षा अधिक हल्लेखोर सहभागी असण्याची शक्यता अधिक आहे. कुणी मान चिरत असेल आणि ती चिरू दिली जाईल, असे अशक्यच आहे. संपूर्ण ताकदीनिशी तो प्रतिकार करणारच. सारीच शक्ती एकवटून केलेला त्याचा तो प्रतिकार रोखण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तिंची गरज आहे. प्रथमेशवर गुदरलेल्या प्रसंगातही शक्तीशाली आणि खुनशी मानसिकतेच्या एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहेच. हे देखील तपासावे मुलामुलांच्या टोळ्या असणे. कुठल्याशा मुद्यावरून त्यांच्यात संघर्ष असणे. वारंवार त्यासाठी खटके उडणे आणि दोन टोळ्यांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे कुठल्या एका बधिर क्षणाला असा गुन्हा घडण्याची शक्यता असू शकते. मुलांना भोजन देण्यासाठी, त्यांच्या देखरेखीच्या कामासाठी काही युवक आश्रमपरिसरातच वास्तव्याला आहेत. ही मुले पिंपळखुटा वा परिसरातील असल्यामुळे आणि प्रथमेशपेक्षा वयाने मोठी असल्यामुळे त्यांचा या प्रथमेशसम मुलांवर धाक ठेवण्याचा प्रकारही नजरेआड घालता येणार नाही. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाने पिंपळखुट्यातील स्थायी मुले बलवान झाल्याने शिक्षणासाठी येणाऱ्या ‘पाहुण्या’ मुलांवर ते हुकूमत गाजवू शकतात. न जुमानणाऱ्या मुलांना धडा शिकिवण्याच्या मानसिकतेतून असे अतिरेकी गुन्हेगारी कृत्य घडू शकते. घडलेला प्रकार बांधकाम सुरू असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी घडला आहे. अर्थात आडोशाला घडलेला आहे. सुटीच्या दिवशी आणि सहज कुणाचे लक्ष जाणार नाही, अशी जागा हल्ल्यासाठी निवडली गेली. त्यामुळेच गुन्हेगार आश्रमाशी सुपरिचित असण्याच्या शक्यतेला विशेष बळ मिळते. तपास त्यादृष्टीनेही केला जावा.