शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:30 IST

सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शनिवारी विद्यापीठातील संपूर्ण कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्यापीठासमोर धरणे देखील दिले.

ठळक मुद्देकामकाज दिवसभर बंद : नवनीत राणांची आंदोलनस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शनिवारी विद्यापीठातील संपूर्ण कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्यापीठासमोर धरणे देखील दिले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी आंदोलनाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच मुख्यमंत्र्यांसमोर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.मागील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या आंदोलनात शनिवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप कर्मचाºयांनी पुकारला होता. यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांसह विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी देखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले होते. गत आठडवड्यात राज्यभरातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने यांची भेट घेून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ जुलैपासून कर्मचाºयांनी बेमुदत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.मुख्यमंत्र्यांची घेणार भेटविद्यापीठ कर्मचाऱ्यांनी विद्यापीठातील कामकाज बंद करून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. त्यावेळी खासदार राणा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असला तरीही आपण आमदार रवी राणा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन विद्यापीठ कर्मचाºयांच्या समस्या त्यांना समजावून सांगू व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन खा. नवनीत राणा यांनी दिले. यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे, सचिव विलास नांदूरकर, शशीकांत रोडे आदींसह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या त्यांच्यासमक्ष मांडल्या.१५ जुलैपासून बेमुदत संपविद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले असून शनिवारी राज्यभरातील अकृषक विद्यापीठातील कर्मचारी एकाच वेळी लाक्षणिक संपावर आहेत. सरकारने १५ जुलैपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास १५ जुलैपासून राज्यातील सर्व विद्यापीठातील कामकाज बंद पडेल. कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा ठणठणीत इशारा विद्यापीठ कर्मचाºयांनी दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेचे केंद्र असलेल्या विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास विद्यापीठे बंद पडून सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला आक्रमकतेचे स्वरूप देण्यासाठी रणनिती आखली आहे.