शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

शिक्षणाचा बट्ट्याबोळ, १९ शाळांची पटसंख्या पन्नाशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:01 IST

महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी लक्ष देतील का? : महापालिका आयुक्तांचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.शिक्षण विभागानुसार, शहरात महापालिकेच्या ६४ शाळा आहेत. त्यात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. पैकी अंबिकानगर येथील हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १२ मध्ये पहिली ते पाचवी या वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे ती शाळा बंद करण्यात येणार आहे. जमील कॉलनी येथील मनपा उर्दू माध्यमिक शाळेत केवळ आठवीतच विद्यार्थी असल्याने ही शाळा दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १९ शाळांमध्ये सरासरी ३ ते ४८ विद्यार्थी संख्या असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पटसंख्येचे हे वास्तव मांडून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा महापालिका शाळांमधील काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. घटत्या पटसंख्येसंदर्भात शिक्षण विभागाने करावयाच्या उपाययोजना व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी गतवर्षी विशेष आमसभेची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशेष आमसभेत शिक्षण विभागावर चर्चा झाल्यास लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीने ती आमसभा घेण्यास प्रशासनाने नकार दिला. मात्र, यंदाही महापालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्येत झपाट्याने घट झाल्याने आयुक्त संजय निपाणे यांनी पुढाकार घेऊन विशेष आमसभा बोलवावी, असा सूर उमटला आहे.एकूण ८७०८ विद्यार्थीमहापालिकेच्या एकूण ६४ शाळांमध्ये ८७०८ विद्यार्थी आहेत. त्यात पहिलीत १११९, दुसरी व तिसरीत प्रत्येकी १२०३, इयत्ता चौथीत १२६५ व पाचवीत १२१३ असे पाच वर्ग मिळून ६००३ विद्यार्थी आहेत. इयत्ता सहावीत ९२३, सातवीत ९०९ व आठवीत ८७३ विद्यार्थी असल्याची नोंद महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे.