शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शिक्षणाचा बट्ट्याबोळ, १९ शाळांची पटसंख्या पन्नाशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:01 IST

महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी लक्ष देतील का? : महापालिका आयुक्तांचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.शिक्षण विभागानुसार, शहरात महापालिकेच्या ६४ शाळा आहेत. त्यात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. पैकी अंबिकानगर येथील हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १२ मध्ये पहिली ते पाचवी या वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे ती शाळा बंद करण्यात येणार आहे. जमील कॉलनी येथील मनपा उर्दू माध्यमिक शाळेत केवळ आठवीतच विद्यार्थी असल्याने ही शाळा दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १९ शाळांमध्ये सरासरी ३ ते ४८ विद्यार्थी संख्या असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पटसंख्येचे हे वास्तव मांडून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा महापालिका शाळांमधील काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. घटत्या पटसंख्येसंदर्भात शिक्षण विभागाने करावयाच्या उपाययोजना व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी गतवर्षी विशेष आमसभेची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशेष आमसभेत शिक्षण विभागावर चर्चा झाल्यास लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीने ती आमसभा घेण्यास प्रशासनाने नकार दिला. मात्र, यंदाही महापालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्येत झपाट्याने घट झाल्याने आयुक्त संजय निपाणे यांनी पुढाकार घेऊन विशेष आमसभा बोलवावी, असा सूर उमटला आहे.एकूण ८७०८ विद्यार्थीमहापालिकेच्या एकूण ६४ शाळांमध्ये ८७०८ विद्यार्थी आहेत. त्यात पहिलीत १११९, दुसरी व तिसरीत प्रत्येकी १२०३, इयत्ता चौथीत १२६५ व पाचवीत १२१३ असे पाच वर्ग मिळून ६००३ विद्यार्थी आहेत. इयत्ता सहावीत ९२३, सातवीत ९०९ व आठवीत ८७३ विद्यार्थी असल्याची नोंद महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे.