शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: July 9, 2017 00:18 IST

शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

काय चाललंय अमरावतीत : प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे. समन्वयाच्या अभावामुळे अमरावती शहराची शान धुळीस मिळत असतानाही प्रशासन निद्रिस्तच आहे. त्यामुळे काय चाललंय अमरावतीत, असा प्रश्न अमरावतीकरांना भेडसावत आहे. १०० कोटींच्या जवळपास पैसा खर्च करून राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल बांधकाम एमएसआरडीसीमार्फत करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाची जबाबदारी नेमकी कुणाकडे हस्तांतरित झाली. त्याची देखभालीची जबाबदारी कुणाची, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असणारा हा उड्डाणपूल आता बेवारस स्थितीत आहे. उड्डाणपुलावरील रस्ता खडतर झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरले नाही. पाणी खाली जाण्याच्या ठिकाणी साचलेल्या मातीत नैसर्गिक वृक्षारोपण झाले आहे. विद्युत बॉक्स तुटफूट झाले आहेत, अशा समस्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलावर दृष्टीस पडत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक जीव गेले आहेत. दररोज खड्डे व माती दगडांमुळे अपघात घडत आहे. आता आणखी जीव जाण्याची प्रतीक्षा तर शहर प्रशासन करीत नाही, अशी शंका येत आहे. महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते, उड्डाणपुलाची जबाबदारी आमची नाही तर मग अमरावतीकरांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शासकीय विभाग जबाबदारी झटकत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? स्वच्छेतेची जबाबदार ही महापालिकेचीच आहे. मग स्वच्छता विभाग काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. देशमुख देतील काय लक्ष ?तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात बनलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता प्रशासकीय कामांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुनील देशमुख हे शहराचे आमदार सुद्धा आहेत. देशमुख शहर विकासासाठी अथक परिश्रम घेत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बनलेल्या या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष करून चालेल का, याकडे आ.सुनील देशमुख लक्ष देतील काय, असा प्रश्न अमरावतीकर उपस्थित करीत आहेत.