शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: July 9, 2017 00:18 IST

शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

काय चाललंय अमरावतीत : प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे. समन्वयाच्या अभावामुळे अमरावती शहराची शान धुळीस मिळत असतानाही प्रशासन निद्रिस्तच आहे. त्यामुळे काय चाललंय अमरावतीत, असा प्रश्न अमरावतीकरांना भेडसावत आहे. १०० कोटींच्या जवळपास पैसा खर्च करून राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल बांधकाम एमएसआरडीसीमार्फत करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाची जबाबदारी नेमकी कुणाकडे हस्तांतरित झाली. त्याची देखभालीची जबाबदारी कुणाची, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असणारा हा उड्डाणपूल आता बेवारस स्थितीत आहे. उड्डाणपुलावरील रस्ता खडतर झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरले नाही. पाणी खाली जाण्याच्या ठिकाणी साचलेल्या मातीत नैसर्गिक वृक्षारोपण झाले आहे. विद्युत बॉक्स तुटफूट झाले आहेत, अशा समस्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलावर दृष्टीस पडत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक जीव गेले आहेत. दररोज खड्डे व माती दगडांमुळे अपघात घडत आहे. आता आणखी जीव जाण्याची प्रतीक्षा तर शहर प्रशासन करीत नाही, अशी शंका येत आहे. महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते, उड्डाणपुलाची जबाबदारी आमची नाही तर मग अमरावतीकरांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शासकीय विभाग जबाबदारी झटकत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? स्वच्छेतेची जबाबदार ही महापालिकेचीच आहे. मग स्वच्छता विभाग काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. देशमुख देतील काय लक्ष ?तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात बनलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता प्रशासकीय कामांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुनील देशमुख हे शहराचे आमदार सुद्धा आहेत. देशमुख शहर विकासासाठी अथक परिश्रम घेत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बनलेल्या या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष करून चालेल का, याकडे आ.सुनील देशमुख लक्ष देतील काय, असा प्रश्न अमरावतीकर उपस्थित करीत आहेत.