शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: July 9, 2017 00:18 IST

शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

काय चाललंय अमरावतीत : प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे. समन्वयाच्या अभावामुळे अमरावती शहराची शान धुळीस मिळत असतानाही प्रशासन निद्रिस्तच आहे. त्यामुळे काय चाललंय अमरावतीत, असा प्रश्न अमरावतीकरांना भेडसावत आहे. १०० कोटींच्या जवळपास पैसा खर्च करून राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल बांधकाम एमएसआरडीसीमार्फत करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाची जबाबदारी नेमकी कुणाकडे हस्तांतरित झाली. त्याची देखभालीची जबाबदारी कुणाची, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असणारा हा उड्डाणपूल आता बेवारस स्थितीत आहे. उड्डाणपुलावरील रस्ता खडतर झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरले नाही. पाणी खाली जाण्याच्या ठिकाणी साचलेल्या मातीत नैसर्गिक वृक्षारोपण झाले आहे. विद्युत बॉक्स तुटफूट झाले आहेत, अशा समस्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलावर दृष्टीस पडत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक जीव गेले आहेत. दररोज खड्डे व माती दगडांमुळे अपघात घडत आहे. आता आणखी जीव जाण्याची प्रतीक्षा तर शहर प्रशासन करीत नाही, अशी शंका येत आहे. महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते, उड्डाणपुलाची जबाबदारी आमची नाही तर मग अमरावतीकरांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शासकीय विभाग जबाबदारी झटकत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? स्वच्छेतेची जबाबदार ही महापालिकेचीच आहे. मग स्वच्छता विभाग काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. देशमुख देतील काय लक्ष ?तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात बनलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता प्रशासकीय कामांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुनील देशमुख हे शहराचे आमदार सुद्धा आहेत. देशमुख शहर विकासासाठी अथक परिश्रम घेत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बनलेल्या या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष करून चालेल का, याकडे आ.सुनील देशमुख लक्ष देतील काय, असा प्रश्न अमरावतीकर उपस्थित करीत आहेत.