शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेसाठी ‘आधार’ अनिवार्य

By admin | Updated: May 31, 2016 00:07 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे.

न्यायालयाचे निर्देश : १६ हजार मजूर नोंदणीपासून वंचितअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे. त्याकरिता १५ जून ही तारीख अंतिम असून जिल्ह्यात अद्यापही १६ हजार रोहयोचे मजूर आधार नोंदणीपासून वंचित असल्याची माहिती आहे.रोहयोत अनियमितता, मजुरांच्या वेतनात गौडबंगाल आदी बाबी रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत मजुरांचे खाते उघडले जात आहे. त्याकरिता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. जिल्ह्यात रोहयोचे १ लाख ७६ हजार ६१९ मजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ६१७ मजुरांची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे. १६ हजार ५०४ एवढे मजूर आधार कार्ड नोंदणीपासून वंचित आहेत. रोहयोच्या सरासरीनुसार ९० टक्के मजुरांचे आधार कार्ड राष्ट्रीयीकृत बँकाना जोडण्यात आले आहे. केवळ १० टक्के मजूर आधार नोंदणीपासून वंचित आहेत. अशा मजुरांची नव्याने आधार कार्ड नोंदणी करुन १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत रिकाम्या हाताला कामे मिळावी, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे जिल्ह्यात जोरात सुरु असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे यांनी सांगितले. १५ जूनपर्यंत आधारची नोंदणी करून प्रत्येक रोहयोच्या मजुरांना राष्ट्रीयकृत बँकेशी जोडले जाणार आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने अवगत केले आहे. १४५ कोटींपैकी चिखलदरा, धारणी या तालुक्यात ६५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. राज्यात रोहयोची १४५ कोटी रुपयांची कामे करण्यात अमरावती जिल्हा अव्वल असल्याचा बहुमान पटकाविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन, कृषि, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आदी यंत्रणेमार्फत रोहयोची कामे केली जातात. विभागाच्या मागणीनुसार रोहयोची कामे मंजूर केली जातात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून निधी वळता केला जातो. मात्र मेळघाटात आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयो जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात रोहयोच्या ८४०१६ मजुरांची पोस्टात खाते असून ते लवकरच राष्ट्रीयकृत बँकेत वळती केली जाणार आहे. ७४११३ रोहयो मजुरांचे राष्ट्रीयीकृत बँकेत आधारकार्ड क्रमांक जोडणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्यात रोहयो मजुरांची संख्याअचलपूर १०५५३, अमरावती ५०२०, अंजनगाव सूर्जी २४७७, भातकुली ४८२८, चांदूर बाजार ११०७०, चांदूर रेल्वे ९५५२, दर्यापूर ५५२४, धामणगाव रेल्वे ६०४०, धारणी ३४८७१, मोर्शी १७९२१, नांदगाव खंडेश्वर ८३११, तिवसा ६२१७, वरुड १०६१९३१ मार्च २०१६ पर्यत जिल्ह्यात १४४ कोटी रुपये रोहयोंवर खर्च करण्यात आले आहे. ही आकडेवारी राज्यात सर्वाधिक ठरली आहे. कुशल, अर्धकुशल मजुरांना कामे दिली जात आहेत. रोहयोच्या सर्वच मजुरांचे आधार कार्ड क्रमांकाशी नोंदणी केली जाणार आहे.- आर. डी. काळे,उपजिल्हाधिकारी, रोहयो