शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2024 19:24 IST

इंदिरा गांधी नगरात वर्षभरापासून पाणी टंचाई असल्याचा भीम ब्रिगेडचा आरोप

अमरावती : शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) येथे मागील एक वर्षापासून पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला वारंवार यासंदर्भात माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भीम ब्रिगेडने सोमवारी जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) हा झोपडपट्टी परिसर असून येथे बहुसंख्य प्रमाणात मजूर वर्ग रहिवासी आहेत. या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे. या भागामध्ये रात्री १ वाजता पाणीपुरवठा करण्यात येत असून तो पहाटे बंद केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी येथील मजूर वर्गाला रात्रभर जागरण करावे लागत आहे. तर याच परिसराला लागून असलेल्या इतर कॉलनी परिसरात मात्र सकाळी ६ ते १० या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे यासंदर्भात परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातही पाइपलाइनला फोर्स नसल्याने नळाला कमी धार असल्याने एक ते दोन तासात पूर्ण पाणी भरणेही अशक्य आहे. त्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी रात्रीचा पाणी पुरवठा बंद करून तो सकाळी करण्यात यावा तसेच नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. चार दिवसांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.