शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2024 19:24 IST

इंदिरा गांधी नगरात वर्षभरापासून पाणी टंचाई असल्याचा भीम ब्रिगेडचा आरोप

अमरावती : शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) येथे मागील एक वर्षापासून पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला वारंवार यासंदर्भात माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भीम ब्रिगेडने सोमवारी जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) हा झोपडपट्टी परिसर असून येथे बहुसंख्य प्रमाणात मजूर वर्ग रहिवासी आहेत. या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे. या भागामध्ये रात्री १ वाजता पाणीपुरवठा करण्यात येत असून तो पहाटे बंद केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी येथील मजूर वर्गाला रात्रभर जागरण करावे लागत आहे. तर याच परिसराला लागून असलेल्या इतर कॉलनी परिसरात मात्र सकाळी ६ ते १० या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे यासंदर्भात परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातही पाइपलाइनला फोर्स नसल्याने नळाला कमी धार असल्याने एक ते दोन तासात पूर्ण पाणी भरणेही अशक्य आहे. त्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी रात्रीचा पाणी पुरवठा बंद करून तो सकाळी करण्यात यावा तसेच नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. चार दिवसांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.