शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2024 19:24 IST

इंदिरा गांधी नगरात वर्षभरापासून पाणी टंचाई असल्याचा भीम ब्रिगेडचा आरोप

अमरावती : शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) येथे मागील एक वर्षापासून पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला वारंवार यासंदर्भात माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भीम ब्रिगेडने सोमवारी जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) हा झोपडपट्टी परिसर असून येथे बहुसंख्य प्रमाणात मजूर वर्ग रहिवासी आहेत. या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे. या भागामध्ये रात्री १ वाजता पाणीपुरवठा करण्यात येत असून तो पहाटे बंद केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी येथील मजूर वर्गाला रात्रभर जागरण करावे लागत आहे. तर याच परिसराला लागून असलेल्या इतर कॉलनी परिसरात मात्र सकाळी ६ ते १० या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे यासंदर्भात परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातही पाइपलाइनला फोर्स नसल्याने नळाला कमी धार असल्याने एक ते दोन तासात पूर्ण पाणी भरणेही अशक्य आहे. त्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी रात्रीचा पाणी पुरवठा बंद करून तो सकाळी करण्यात यावा तसेच नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. चार दिवसांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.