शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:40 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला.

ठळक मुद्देधक्कादायक : दोन दिवसांत एका शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर दोन दिवसात एक शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामूळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मूलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१८ पर्यत तीन हजार ५५४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ९७२ प्रकरणे पात्र, १ हजार ९७२ अपात्र तर ५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. निराषेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्तिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असतांना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.२००१ पासूनच ३,४१८ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३,५२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिण्यात २६७, फेब्रूवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २७२, जुलै २८४, आॅगष्ट ३४३, सप्टेंबर ३३५, आॅक्टोंबर ३१४, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिण्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शेतकरी मिशन अपयशीराज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारणे कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशलला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र शेतकºयांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पुर्णपणे अपयश आले आहे.यंदा आॅक्टोबर महिण्यात २९ आत्महत्या*यंदा १९९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २९ घटना आॅक्टोबर महिण्यातील आहेत. जानेवारी २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४, जून १५, जुलै २०, आॅगष्ट १९ सप्ष्टेंबर २०व आॅक्टोबर महिण्यात २९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.