शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:40 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला.

ठळक मुद्देधक्कादायक : दोन दिवसांत एका शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर दोन दिवसात एक शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामूळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मूलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१८ पर्यत तीन हजार ५५४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ९७२ प्रकरणे पात्र, १ हजार ९७२ अपात्र तर ५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. निराषेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्तिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असतांना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.२००१ पासूनच ३,४१८ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३,५२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिण्यात २६७, फेब्रूवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २७२, जुलै २८४, आॅगष्ट ३४३, सप्टेंबर ३३५, आॅक्टोंबर ३१४, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिण्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शेतकरी मिशन अपयशीराज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारणे कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशलला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र शेतकºयांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पुर्णपणे अपयश आले आहे.यंदा आॅक्टोबर महिण्यात २९ आत्महत्या*यंदा १९९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २९ घटना आॅक्टोबर महिण्यातील आहेत. जानेवारी २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४, जून १५, जुलै २०, आॅगष्ट १९ सप्ष्टेंबर २०व आॅक्टोबर महिण्यात २९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.