शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:40 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला.

ठळक मुद्देधक्कादायक : दोन दिवसांत एका शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर दोन दिवसात एक शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामूळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मूलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१८ पर्यत तीन हजार ५५४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ९७२ प्रकरणे पात्र, १ हजार ९७२ अपात्र तर ५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. निराषेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्तिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असतांना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.२००१ पासूनच ३,४१८ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३,५२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिण्यात २६७, फेब्रूवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २७२, जुलै २८४, आॅगष्ट ३४३, सप्टेंबर ३३५, आॅक्टोंबर ३१४, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिण्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शेतकरी मिशन अपयशीराज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारणे कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशलला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र शेतकºयांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पुर्णपणे अपयश आले आहे.यंदा आॅक्टोबर महिण्यात २९ आत्महत्या*यंदा १९९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २९ घटना आॅक्टोबर महिण्यातील आहेत. जानेवारी २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४, जून १५, जुलै २०, आॅगष्ट १९ सप्ष्टेंबर २०व आॅक्टोबर महिण्यात २९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.