लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा टप्पा क्रमांक २ योजनेचे काम महानगरात संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे सदर कंत्रादाराला दरदिवशी ९० हजार रुपये याप्रमाणे दंड आकारून तो १८० दिवसांत वसूल करण्याचा निर्णय मजीप्राच्या बैठकीत घेण्यात आला. आ. सुनील देशमुख यांनी सोमवारी आढावा बैठकीत निविदेच्या कलम २ नुसार कारवाई करण्याचा सूचना अधिकाºयांना दिल्यात.अमरावती व बडनेरा शहरात ‘अमृत’ योजनेमध्ये नवीन जलशुध्दीकरण केंद्र, सिंभोरा धरण येथे ९५० अश्वशक्तीचे नवे पंपिंग केंद्र, शहरातील नव्याने विस्तारीत भागात, ११ नवीन जलकुंभ त्याचप्रमाणे अंदाजे ५०० किमीच्यावर नवीन पाईपलाइनचे जाळे टाकणे आदी कामे अंदाजे ११४ कोटींतून केले जात आहे. पाणी पुरवठ्याची कामे निर्धारित वेळेत होऊन कामांचा दर्जा योग्य असावा, यासाठी आ.सुनील देशमुख यांनी मजीप्राच्या अधिकाºयांसमवेत यापूर्वीदेखील आढावा बैठक घेऊन काही बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले होते. यामध्ये बारचार्टप्रमाणे ठरविलेले उद्दिष्ट विहीत वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत आ. देशमुख यांनी मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्याना विचारणा केली. सद्यस्थितीत टाक्या उभारणे व विशेषत: पाईपलाइन अंथरुन त्यांच्या जलदाब चाचण्या घेण्याचे कार्य अतिशय संथगतीने सुरू असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘अमृत’ योजनेवर २३ आॅक्टोबरपर्यंत २१ कोटी ४० लाखांचे कार्य पूर्ण झालेले आहे. योजनेची भौतिक प्रगती ३० टक्के व आर्थिक प्रगती २३ टक्के एवढीच झालेली आहे.भुयारी गटार योजनेची लवकरच निविदाआ.सुनील देशमुख यांनी रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावित कामासंदर्भात माहिती जाणून घेतली. भुयारी गटारच्या कामाची निविदा अंतिम टप्यात असून मंजुरी मिळताच कामे सुरू केले जातील, असे मजीप्राच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.
‘अमृत’ला दरदिवशी ९० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:43 IST
शासनाच्या अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा टप्पा क्रमांक २ योजनेचे काम महानगरात संथगतीने सुरू आहेत.
‘अमृत’ला दरदिवशी ९० हजारांचा दंड
ठळक मुद्देसुनील देशमुख संतापले : पाणी पुरवठ्याच्या कामांची संथगती भोवली