शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजापेठ उड्डाणपुलासाठी ९० टक्के वसुली बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:14 IST

महापालिका हद्दीत विकास प्रकल्प राबविण्यासाठी निधी देताना काही सुधारणा बंधनकारक, तर काही सुधारणा वैकल्पिक करण्यात आल्या आहेत.

सुधारणा अनिवार्य : प्रशासकीय मान्यतेचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीत विकास प्रकल्प राबविण्यासाठी निधी देताना काही सुधारणा बंधनकारक, तर काही सुधारणा वैकल्पिक करण्यात आल्या आहेत. राजापेठ उड्डाणपुलाला प्रशासकीय मान्यता देताना नगरविकास विभागाने अशा नऊ प्रकारच्या सुधारणा अमरावती महापालिकेसाठी बंधनकारक केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मालमत्ता कराची वसुली ९० टक्क्यांपर्यंत अनिवार्य करण्यात आली आहे.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीच्या प्रमाणात अनुदान देण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले आहे. त्या पार्श्वभूमिवर ११ मे रोजी शहरातील राजापेठ उड्डाणपूल प्रकल्पास नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. प्रकल्पाच्या १६३२ कोटींच्या वित्तीय आकृतीबंधाला मान्यता देताना व निधी वितरणासाठी महापालिकेला काही बंधने घालून दिली आहेत. बंधनकारक सुधारणा पूर्ण केल्याशिवाय राज्य शासनाचे अनुदान मिळणार नाही, असे यात बजावण्यात आले आहे. राजापेठ उड्डाणपूल २४ महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेची राहील, ३१ मे २०१७ पूर्वी अमरावती शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी महापालिका यंत्रणेला पेलायची आहे, प्रकल्प मंजुरीच्या पहिल्या वर्षात नगरपरिषद, नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद सुधारणा याची १०० टक्के अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे, उचित उपभोक्ता कर लागू करून किमान ८० टक्के वसुली करून नागरी क्षेत्रातील गरिबांसाठी अर्थसंकल्पात विवक्षित निधीची तरतूद करण्याचे सूचना मनपाला आहेत. महापालिकेने द्विलेखा नोंद पद्धती सहा महिन्यात पूर्ण करणे आवश्यक राहील, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या क्षेत्रातील मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन झाले नसल्यास प्रकल्प मंजुरीपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीत ते पूर्ण करणे बंधनकारक राहील. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६’ च्या तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन उचितरित्या करणे बंधनकारक राहील, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराची व पाणीपट्टीची वसुली पहिल्या वर्षी किमान ८० टक्के करणे बंधनकारक राहील. पुढील वर्षात सदरहू वसुली उर्वरीत ९० टक्के या प्रमाणात करणे आवश्यक राहील.वैकल्पिक सुधारणामलनिस्सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी भागातील सांडपाण्याचे पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर करण्याबाबतच्या घटकांचा समावेश त्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करावा, अशी सूचना नगरविकास विभागाने दिली आहे. याशिवाय महापालिकेला रेन हार्वेस्टिंग, जललेखापरिक्षण करणेही बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र या वैकल्पिक सुधारणा आहेत.