शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

९० प्रकल्पात सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा, ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे १० गेट पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

अमरावती : गेले दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तथा दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, ...

अमरावती : गेले दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तथा दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु, अशा एकूण ९० प्रकल्पांत सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे.

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.३६ टक्के पाणीसाठा झाला असून, १३ पैकी १० गेट बंद करण्यात आले असून, आता ३ गेट ३५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ९४.०७ टक्के पाणीसाठा, तर ४ गेट ५ सेंमीने उघडले. चंद्रभागा प्रकल्पात ९३.३६ टक्के पाणीसाठा असून, २ गेट ५ सेंमी, तर पूर्णा प्रकल्पात ७९.७९ टक्के, तर ३ गेट १० सेंमीने उघडण्यात आले. सपनमध्ये ९०.७५ टक्के, तर पंढरी मध्यम प्रकल्पात १३.९५ टक्के पाणीसाठा असून, एकूण पाच प्रकल्पांत सरासरी ७०.२४ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती गुरुवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ८४ लघु प्रकल्पांत ६३.३५ टक्के पाणीसाठा आहे.