शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 13, 2017 00:10 IST

बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते.

मंदगतीचा परिणाम : नाफेड संलग्नित यंत्रणांचा ढिसाळ कारभार अमरावती : बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील दहा केंद्रांवर मंगळवारपर्यंत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीसाठी बाकी आहे. यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक फटका बसत आहे. सद्यस्थितीत चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात व्हिसीएमएफ व नाफेड तसेच अमरावती व धामणगाव येथे एफसीआय तसेच अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार दर्यापूर व वरुड येथे डिएमओद्वारा शासकीय तूर खरेदी डिसेंबरच्या अखेरीस करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रावर २.६२ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची १३१.७ कोटी एवढी रक्कम आहे. अद्यापही काही केंद्रांवर १५ ते २० दिवसांचे चुकारे करणे बाकी आहे. एफसीआयचे अमरावती व धामणगाव येथील केंद्र बारदान्याअभावी बंद आहे. धामणगाव बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली असताना एफसीआयद्वारा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. मात्र भंडारा येथून एक लाख बारदाना मागविण्यात आला. यापैकी ३० हजार बारदाना एफसीआयला भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची मोजणी सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे केंद्रनिहाय तूर मोजणी बाकी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे चार हजार क्विंटल, नांदगाव २५०० क्विंटल, मोर्शी ८ हजार क्विंटल, अमरावती २० हजार क्विंटल, धामणगाव १० हजार क्विंटल, अचलपूर ९ हजार क्विंटल, अंजनगाव सुर्जी ७५०० क्विंटल, चांदूरबाजार ३५०० क्विंटल, दर्यापूर १७ हजार क्विंटल व वरुड येथील केंद्रांवर सहा हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणे दाखवून अचानकपणे तूर खरेदी बंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल मोजणीसाठी पडून आहे. तूर मोजणीदेखील मंदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा नाहक ताटकडत बसावे लागते व तूर मोजणीपर्यंत मालाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची असल्याने तूर चोरीस व वजन घटने याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो