शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 13, 2017 00:10 IST

बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते.

मंदगतीचा परिणाम : नाफेड संलग्नित यंत्रणांचा ढिसाळ कारभार अमरावती : बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील दहा केंद्रांवर मंगळवारपर्यंत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीसाठी बाकी आहे. यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक फटका बसत आहे. सद्यस्थितीत चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात व्हिसीएमएफ व नाफेड तसेच अमरावती व धामणगाव येथे एफसीआय तसेच अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार दर्यापूर व वरुड येथे डिएमओद्वारा शासकीय तूर खरेदी डिसेंबरच्या अखेरीस करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रावर २.६२ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची १३१.७ कोटी एवढी रक्कम आहे. अद्यापही काही केंद्रांवर १५ ते २० दिवसांचे चुकारे करणे बाकी आहे. एफसीआयचे अमरावती व धामणगाव येथील केंद्र बारदान्याअभावी बंद आहे. धामणगाव बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली असताना एफसीआयद्वारा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. मात्र भंडारा येथून एक लाख बारदाना मागविण्यात आला. यापैकी ३० हजार बारदाना एफसीआयला भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची मोजणी सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे केंद्रनिहाय तूर मोजणी बाकी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे चार हजार क्विंटल, नांदगाव २५०० क्विंटल, मोर्शी ८ हजार क्विंटल, अमरावती २० हजार क्विंटल, धामणगाव १० हजार क्विंटल, अचलपूर ९ हजार क्विंटल, अंजनगाव सुर्जी ७५०० क्विंटल, चांदूरबाजार ३५०० क्विंटल, दर्यापूर १७ हजार क्विंटल व वरुड येथील केंद्रांवर सहा हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणे दाखवून अचानकपणे तूर खरेदी बंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल मोजणीसाठी पडून आहे. तूर मोजणीदेखील मंदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा नाहक ताटकडत बसावे लागते व तूर मोजणीपर्यंत मालाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची असल्याने तूर चोरीस व वजन घटने याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो