शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सात तालुक्यांत ८७ किलोमीटरचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:02 IST

जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्तीसाठीही ४.८० कोटी रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य त्यासाठी घेतले जाणार आहे.

ठळक मुद्दे७२ कोटी बांधकाम खर्च : ग्रामविकास विभागाची प्रशासकीय मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्तीसाठीही ४.८० कोटी रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य त्यासाठी घेतले जाणार आहे.मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रत्येक रस्त्यासाठी तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहिल.सदर रस्त्यांसाठी लागणारी जमिन ग्रामविकास विभागाच्या ताब्यात आहे, याची धातरजमा करण्यात यावी. खासगी जमिन अथवा वनविभागाची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे हाती घेऊ नयेत, असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.दर्यापूर तालुक्यात ८ कोटी रुपयेदर्यापूर तालुक्यातील सहा रस्त्यांना मान्यता दिली. यात नांदरुण ते भामोद रस्त्यासाठी २.०८ कोटी रुपये, गोडेगाव रस्त्यासाठी ६४.६१ लाख रुपये, बोराळा आराळा रस्त्यासाठी १.७३ कोटी रुपये, येवदा कातरखेडा तेलखेडा या २.१० किमी रस्त्यासाठी १.७६ कोटी रुपयेल माहूली धांडे रस्त्यासाठी १.७५ कोटी रुपये, राज्यमहामार्ग २७८ ते नालवाडा रस्त्यासाठी ८८.९४ लाख रुपये मंजूर केलेत. मोचर्डा रस्त्यासाठी ७३.०९ लाख रुपये, व राज्यमहामार्ग २७८ ते बेंब्या खुर्द रस्तानिर्मितीसाठी ७८.५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यात २.१४ कोटींतून रस्तेअंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी रत्नापुर या ५.७० किमी लांबीच्या रस्ताबांधकामासाठी ७.४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ४९.६३ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पांढरी ते खोडगाव रस्त्यासाठी १.३० कोटी, शेलगाव रस्त्यासाठी १.४० कोटी रुपये व सर्फापूर रस्त्यासाठी २.१४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.चांदूरबाजार तालुक्यात ११ किमीचे रस्तेचांदूरबाजार तालुक्यातील लाखनवाडी ते करजगाव रस्त्यासाठी २.१४ कोटी, आखतवाडा ते शिरजगाव बंड रस्तानिर्मितीसाठी १.४७ कोटी रुपये, तीन किमीच्या बेसखेडा रस्त्यासाठी २.२६ कोटी रुपये, जसापूर ते कोदोरी रस्त्यासाठी २.४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या चार रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.चिखलदारा तालुक्यात पाच रस्तेचिखलदरा तालुक्यातील पाच रस्त्यांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. त्यात १.५९ किमीच्या बुटिदा रस्त्यासाठी १.२४ कोटी, चुर्णीढाण्या पलस्या रस्त्यासाठी २.०२ कोटी रुपये, काटकुंभ ते रजनीकुंड या २.५५ किमीच्या रस्त्यासाठी १,७३ कोटी रुपये, चुर्णी ते कारदा साठी ४.२३ कोटी रुपये, भंडोरा रस्त्यासाठी २.३८ कोटी रुपये खर्च येईल.मोर्शी तालुक्यात पाच रस्तेमोर्शी तालुक्यात ५२.७९ लाख रुपये खर्च करुन दुर्गवाडा रस्ता, कोळविहीर ते ब्राम्हणवाडा ते बहिरम रस्त्यासाठी ३.६७ कोटी रुपये, मायवाडी १.१४ कोटी, रिध्दपूर ते दाभेरी ब्राम्हणवाडा रस्त्यासाठी ३.५५ कोटी, व १.८६ किमी लांबीच्या मोळवणसाठी १.६७ कोटी रुपये खर्च केले.नांदगाव तालुक्यात तीन रस्तेनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर- शिवरा रस्त्यासाठी ४.४३ कोटी रुपये, ढवलसरी -चांदसुरा रस्त्यासाठी २.७३ कोटी रुपये, सुलतानपूर ते नविन बेलोरा रस्त्यासाठी १.७६ कोटी रुपये खर्च येणार आहे.तिवसा तालुक्यात चार रस्तेग्रामविकास विभागाने तिवसा तालुक्यातील चार रस्त्यांना मान्यता देण्यात आली. यात ३ किमीचा शेंदूरजना-डेहणी-निंभोरा भारसवाडी रस्त्यासाठी २.२६ कोटी रुपये, वरुडा ते दापोरी राजुरवाडी या रस्त्यासाठी ४.३० कोटी रुपये, भांबोरा ते पालवाडी रस्ता बांधकामासाठी २.८१ कोटी रुपये व विरगव्हान जोडरस्त्यासाठी ७७.६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामांना लवकरच प्रारंभ होईल.