शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महापालिका क्षेत्रात खासगी भागीदारीतून ८६० घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:24 IST

सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते.

ठळक मुद्देआर्थिक दुर्बल घटकांना लाभ : दुर्बल घटकातील १९,५२९ नागरिकांचे आॅनलाईन अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ६८७ लाभार्थ्यांकडून डीडीच्या स्वरूपात प्रती ४९ हजारांची अमानत रक्कम महापालिकेद्वारा जमा करण्यात आलेली आहे.गृहनिर्माण विभागाच्या निर्देशाप्रमाणे ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेत चार घटक अंतर्भूत केलेले आहे. यात शहरी भागाकरिता महापालिका ही अंमलबजावणी यंत्रणा आहे. यामध्ये चार घटकांत २०२१-२२ दरम्यान २४ हजार ८१० घरकुलांची निर्मिती केली जाईल. यात घटक क्रमांक तीनमध्ये खासगी भागीदारीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ८६० घरकुलांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्याने तीन दिवसांपूर्वीच या योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. या घटकांतर्गत लाभार्थ्यांना शासनाचे अडीच लाखांचे अनुदान व ३० चौरस मीटर चटईक्षेत्र राहील. महापालिका हद्दीत बडनेरा, बेलोरा, निंबोरा, नवसारी तारखेडा, म्हसला व रहाटगाव येथील भूखंडाची निवड झालेली आहे.या घटकात सदनिकेची किंमत नऊ लाखांपर्यंत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना सहा लाखांचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी महापालिकेद्वारा बँकांशी समन्वय साधला जात आहे व या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून विकासकासोबत १२ डिसेंबरला करारनामा करण्यात आल्याची माहिती उपअभियंता सुनील चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. या आठवड्यात भूमीपूजन झालेल्या ८६० घरकुलांचे बांधकाम आॅक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.