शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पाणीटंचाईसाठी ७९७ गावांत ८५२ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:05 IST

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ...

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले आहेत.

पाणीटंचाई आराखड्यानुसार ७९७ गावांत ८५२ उपाययोजनांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५९ गावांतील १६३ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात २९ गावांत १५ विंधनविहिरी व १८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३, भातकुली तालुक्यात १, मोर्शी तालुक्यात विंधनविहिरी व खासगी विहिरी मिळून सहा, वरूड तालुक्यात एक, चांदूर रेल्वे तालुक्यात ७, अचलपूर तालुक्यात ८ बोअरवेल व एक खासगी विहीर, चिखलदरा तालुक्यात ६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

टंचाई आराखड्यात विंधनविहीर, कूपनलिका घेणे, नळयोजनांची, विंधनविहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरने पाणी पुरवठा, खासगी विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील ३६ नळयोजना पूर्ण करणे असा ७९७ गावांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यातील १६३ उपाययोजनांसाठी ५ कोटी ९० लक्ष निधी मंजूर आहे. सद्यस्थितीत ९४ गावांत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी २ कोटी ३ लक्ष खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीची ७२ कामे प्रस्तावित असून, त्यासाठी १ कोटी ८७ लाख रुपये, तर मंजूर ६५ कामांसाठी ३ कोटी ७८ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.

बॉक्स

सहा गावांत टँकरने पाणी पुरवठा

सद्यस्थितीत टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यात चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी, सोमारखेडा, मलकापूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुरे या सहा गावांचा समावेश आहे. एप्रिल पश्चात भूजलात कमी येत असल्याने अनेक गावांतील जलस्रोत कोरडे पडत असल्याने महिनाअखेर टँकरची संख्यावाढ होणार आहे.