शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

By admin | Updated: April 13, 2017 00:08 IST

जिल्हाभरातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८३९ ग्रामपंचायतींचे येत्या ३ ते ६ मे दरम्यान एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केले जाणार आहे.

तपासणी: सर्व कामांचे मूल्यमापन; १० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पथकात समावेशअमरावती : जिल्हाभरातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८३९ ग्रामपंचायतींचे येत्या ३ ते ६ मे दरम्यान एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यात बहूदा पहिला ठरणार आहे. ग्रामस्तरावर विकासाचा मुख्यकेंद्र बिंदू म्हणून ग्रामपंचायत ही ग्रामविकासात महत्वाची संस्था आहे. या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम ग्रामविकासाठी राबविले जातात. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विकास कामांसोबतच विविध योजना स्थानिक पातळीवर सुध्दा राबविल्या जातात. यासाठी वर्षभर होणारे प्रशासकीय कामकाज सुध्दा तेवढेच गतीमान असावे हा हेतू लक्षात घेता, आतापर्यत विभागीय आयुक्त, सीईओ, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचातींच्या दप्तरांची तपासणी केली जात होती. मात्र या अधिकाऱ्यांवर कामांचा वाढता व्याप लक्षात घेता बहुदा दप्तर तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत होत्या. या प्रार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीसाठी नवीन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायत तपासणी साठी समर्थ हायस्कुल येथे पहिली कार्यशाळा सुध्दा घेण्यात आली आहे.काय होणार फायदे?ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामातील थंडावलेली प्रक्रिया गतीमान होईल. १ ते ३३ नमूने तसेच शासनाकडून मिळालेला निधी, त्याचा झालेला विकास कामांवरील जमा खर्च, स्थानिक सुविधा, कर वसुली, ग्रामसभा, अशी महत्वाची कामे या तपासणी मुळे गतीमान होतील. कुठलेही काम हे ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीच पूर्ण होऊन नवीन आर्थिक वर्षातील कामे करण्यास मदत होणार आहे.दीडशे अधिकारी नियुक्तजिल्ह्यातील८३९ ग्रामपंचायतींच्या तपासणी एकाच वेळी तीन दिवस केली जाणार आहे. याकरिता १५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात १० जणांचे पथक राहील. पथक प्रमुख म्हणून सहायक गटविकास अधिकारी हे राहतील. विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य, कृषी, समाज कल्याण तसेच प्रशासन अधिकारी आदींचा समावेश पथकात आहे. हे पथक नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय दप्तरांची तपासणी करणार आहे.वर्गवारी ठरणारजिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणी मोहिमेत उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज करणाऱ्या ग्रामपंचायतींनुसार तालुकानिहाय वर्गवारी ठरविली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व तपासणी क्रॉस चेकींग होणार आहे. तपासणी पथकाचा दौरा गोपनीय राहणार असून पंचायत समितीला दोन दिवस अगोदर तालुक्यात पथक येणार असल्याची माहिती दिली जाईल. मात्र कुठल्या ग्रामपंचायतीची तपासणी होईल, हे वेळेवरच स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषद पंचायत विभागाने ग्रामपंचायतींचे दस्तऐवज एकाच वेळी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाज विहित कालावधीतच पूर्ण व्हावे, यासाठी हा नवीन उपक्रम राबविला जाणार आहे.जे. एन. आभाळे डेप्युटी सीईओ,(पंचायत)