शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अचलपूर तालुक्यात ८0 बालके कुपोषित

By admin | Updated: June 3, 2014 23:45 IST

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढतेच आहे. जानेवारी २0१४ मध्ये करण्यात

सुनील देशपांडे - अचलपूरबालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु  अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढतेच आहे. जानेवारी २0१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अचलपूर तालुक्यातील ८0 बालके  कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यातील ४ बालकांना दुर्धर आजाराने ग्रासले असून ११ बालके सॅम म्हणजेच अति कुपोषणाच्या वर्गवारीतील आहेत. यातील पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४0 बालके कुपोषित आहेत. गरोदर मातांना वेळेवर योग्य लस न मिळणे, मातेची उंची व वजन कमी असणे, बाळ जन्मल्यानंतर त्याचे वजन दोन किलोच्या आत असणे, अंगणवाडीतून मिळणारा आहार नियमित व प्रोटीनयुक्त न मिळणे या प्रमुख कारणांसह आदी कारणांमुळे बालके कुपोषित होतात. संबंधित अधिकार्‍यांच्या उदासिनतेने या बाबींकडे लक्ष पुरविले जात नसल्याने अचलपूर तालुक्यात कुपोषण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यातील तीन आरोग्य केंद्रांतर्गत ८ बालके कुपोषित आहेत. यात धामणगाव गढी ३७, येसुर्णा १३ व पथ्रोट केंद्रांतर्गत ४0 बालके कुपोषित आहेत, अशी स्थिती जानेवारी महिन्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत केलेल्या सर्वेक्षणात पुढे  आली आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयातून देण्यात येणारी सुकळी, शिरा, उपमा हा सकस आहार गरोदर माता खाण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्याची पाकिटे काही केंदामधून विकली जातात. गर्भवती महिलेला दोन महिन्यात १२ पाकिटे मिळतात. ही विकलेली पाकिटे सरळ जनावरांपुढे ठेवली जातात. तसेच इंदिरा गांधी मातृत्व सेवा योजने अंतर्गत मातेला चार हजार रुपये दिले जातात. बाळ जन्मल्यावर त्यानंतर चार महिन्याने व शेवटी सहा महिन्याने हे पैसे किती मातांना मिळाले हा शोधाचा विषय आहे. जननी सुरक्षा योजनेत मातांना मिळणार्‍या सुरक्षेतेची संबंधित अधिकारी व कर्मचारी योग्य काळजी घेत नसल्याने बालके कुपोषित जन्माला येतात, अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.