शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ७७.२४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST

संदीप मानकर, अमरावती : तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात ...

संदीप मानकर, अमरावती : तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ७७.२४ टक्के पाणीसाठा साचला आहे. अनेक मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ८४.१२ टक्के पाणीसाठा झाल्याने या महिन्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२५ मध्यम, नऊ मोठे व ४७७ लघु अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा २५३६.११ दलघमी असून, त्याची सरासरी टक्केवारी ७७.२४ टक्के आहे. १० सप्टेंबरपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील आणखी पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बॉक्स :

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

जलसंपदा विभागाने दिलेल्या ५ सप्टेंबर रोजीच्या पाणीसाठ्याच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के पाणीसाठा साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प हा १०० टक्के भरला. या प्रकल्पातून ४४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अरुणावती प्रकल्पात ९६.३३ टक्के, तर बेंबळा ८६.७५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९४.४४ टक्के, वान प्रकल्पात ८२.३९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त २७.४४ टक्के पाणीसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात ४०.६९ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ९०.६७ टक्के पाणीसाठा असून तीन गेट उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १० सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.

बॉक्स :

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

विभागातील आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून, अनेक प्रकल्प शंभरीच्या वाटेवर आहेत. शंभर टक्के प्रकल्प भरणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, तर अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी व उतावली प्रकल्पाचा समावेश आहे.