शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ७७.२४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST

संदीप मानकर, अमरावती : तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात ...

संदीप मानकर, अमरावती : तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ७७.२४ टक्के पाणीसाठा साचला आहे. अनेक मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ८४.१२ टक्के पाणीसाठा झाल्याने या महिन्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२५ मध्यम, नऊ मोठे व ४७७ लघु अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा २५३६.११ दलघमी असून, त्याची सरासरी टक्केवारी ७७.२४ टक्के आहे. १० सप्टेंबरपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील आणखी पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बॉक्स :

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

जलसंपदा विभागाने दिलेल्या ५ सप्टेंबर रोजीच्या पाणीसाठ्याच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के पाणीसाठा साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प हा १०० टक्के भरला. या प्रकल्पातून ४४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अरुणावती प्रकल्पात ९६.३३ टक्के, तर बेंबळा ८६.७५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९४.४४ टक्के, वान प्रकल्पात ८२.३९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त २७.४४ टक्के पाणीसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात ४०.६९ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ९०.६७ टक्के पाणीसाठा असून तीन गेट उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १० सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.

बॉक्स :

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

विभागातील आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून, अनेक प्रकल्प शंभरीच्या वाटेवर आहेत. शंभर टक्के प्रकल्प भरणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, तर अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी व उतावली प्रकल्पाचा समावेश आहे.