शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

७७ पीडितांना शासनाचे ‘मनोधैर्य’

By admin | Updated: January 5, 2015 22:54 IST

पीडीत मुली व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणे, त्यांना अर्थसहाय्य देऊन पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यात ७७ प्रकरणे निकाली

पुनर्वसन : अत्याचारग्रस्त मुली, बालके व महिलांना १ कोटी १८लाखांची मदतगजानन मोहोड - अमरावतीपीडीत मुली व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणे, त्यांना अर्थसहाय्य देऊन पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यात ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये १ कोटी १८ लाख रूपयांची आर्थिक मदत ४६ मुली, ४ बालके व २७ महिलांना मदत देण्यात आली. जिल्हा क्षती सहाय्य व पुनर्वसन योजनेंतर्गत आजवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सहा बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने २१ आॅक्टोबर २०१३ पासून ‘मनोधैर्य’ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळ जिल्ह्यात कार्यरत आहे. ही संपूर्ण योजना महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. योजनेला सुरुवात झाल्यापासून जिल्हा क्षती सहाय्य व पुनर्वसन समितीच्या आजवर सहा बैठकी झाल्या आहेत. किमान ४ ते ५ प्रकरणे जमा झाल्यावर ही बैठक होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे परिविक्षा अधिकारी सुभाष अवचार यांनी दिली. पीडितांचे समुपदेशन देखील तत्काळ करण्यात येते. प्रकरण मंजूर झाल्यावर तत्काळ निधी पीडितांच्या खात्यात जमा केला जातो.असा आहे अर्थसहाय्याचा विनियोगजिल्हा मंडळाकडून आदेश प्राप्त झाल्यावर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मंजूर रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करतात. यापैकी ७५ टक्के रक्कम ‘फिक्स डिपॉझिट’मध्ये ३ वर्षांसाठी ठेवण्यात येते. उर्वरित २५ टक्के रक्कम पीडित किंवा पालकांना खर्च करता येते. पीडित व्यक्ती अज्ञानी असेल तर त्यांच्या खात्यातील ७५ टक्के ‘फिक्स डिपॉझिट’बालक १८ वर्षांचा झाल्यावर मिळू शकेल व उर्वरित रक्कम बालकाच्या हितासाठी खर्च करता येईल.अशी आहे कार्यपद्धतीजिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्याकडून या माहितीच्या आधारे जिल्हा मंडळ निर्णय घेईल व संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांनी ‘एफआयआर’ दाखल झाल्यावर त्याची माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना कळवावी लागते. यानंतर हा विभाग पीडितांचे समुपदेशन करुन त्यांना धैर्य देते.